शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

स्वा.रा.ती.रुग्णालयातील बदली कामगारांचा अंबाजोगाईत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST

अंबाजोगाई : जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील बदली कर्मचाऱ्यांना सेवेत ...

अंबाजोगाई :

जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मागील दहा दिवसांपासून बदली कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने याची कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे पुरुष बदली कर्मचाऱ्यांनी डोक्यावरील केस मुंडन व अर्धनग्न होत गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९ जुलै १९९९ रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सन २००० मध्ये १९ बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ज्येष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर २९ दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे. परंतु, रिक्त असलेल्या पदांवर कायम केले जात नाही. न्यायालयीन आदेशानुसार तयार केलेल्या जेष्ठता यादीतील उर्वरित २१४ कर्मचाऱ्यांना २९ दिवसांच्या तत्वावर कोरोना, सारी, महाभयंकर व इतर रोगांच्या साथीमध्ये आवश्यकतेनुसार कामावर घेतले. त्यांनी रुग्णांची सेवा केली. मात्र, १९८० पासून कार्यरत बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलेले नाही. वेळोवेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडून निघणाऱ्या अटींना कंटाळून बदली कर्मचारी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहेत. १० वर्षे व २४० दिवस भरले पाहिजेत, ही जाचक अट शिथिल करून बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी ३० वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरूवारी विलास काळुंके, शेख जमीर, दिलीप गालफाडे, सिमरन बक्ष, पुष्पा कचरे, ऊर्मिला शिंदे, प्रकाश कसबे, अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.