शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हा तर बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:00 IST

गर्भपिशवी काढण्याचा बाजार; ऊसतोडीला जाण्यास शस्त्रक्रिया नाही

बीड : उसतोडीला जाण्यासाठी महिला गर्भपिशवी काढतात, अशी अफवा राज्यभर पसरविण्यात आली. मात्र, असा कोणताही प्रकार नसून, गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियांची कारणे वेगळीच असल्याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आरोग्य विभागाने शुक्रवारी केला. बीडला बदनाम करण्याचा हा घाट असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे.

बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढण्याचा बाजार सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. याची दखल घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, आरोग्य संचालक डॉ. दयाचंदू यांनी बीड जिल्ह्याचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी अहवाल सादर केला.

आरोेग्य विभागाच्या डॉ. आय.व्ही. शिंदे, डॉ. संतोष शहाणे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. महेश माने व लिपिक विकास शिंदे या पाच सदस्यांच्या समितीने जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी रुग्णालयांचा अहवाल मागविला. यामध्ये ‘टॉप ५’ रुग्णालयांची यादी काढण्यात आली. या रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचे दिसल्याने त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. काही रुग्णालयांची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत समितीने चौकशी केली.अहवालात समोर आलेले मुद्देगेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील ७ गावांच्या केलेल्या सर्व्हेमध्ये २२३ महिलांची गर्भपिशवी काढल्याचे समोर आले. यात पिशवीतील गाठ, अंगावरील लाल, पांढरे जाणे, पोटदुखी, पिशवीला सूज आदी कारणांमुळे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली.दोन दिवसांत निर्णय घेणार!यापूर्वी ३५ वर्षांखालील महिलेची शस्त्रक्रिया करावयाची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविण्याबाबत पत्र काढले होते. त्याचे काहींनी पालनही केले. मात्र, आता यापुढे गर्भपिशवी संदर्भात शस्त्रक्रिया करावयाची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांना कळवावे, असा प्रस्ताव डॉ. अशोक थोरात यांनी बैठकीत मांडला. दोन दिवसांनंतर यावर निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीड