शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

जिल्ह्यातून १३ हजार बालकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

बीड : ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील कामगारांसोबत त्यांच्या १३ बालकांचे स्थलांतर झाले आहे. कारखान्यावर काम करताना तसेच तेथून परतल्यानंतर या ...

बीड : ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील कामगारांसोबत त्यांच्या १३ बालकांचे स्थलांतर झाले आहे. कारखान्यावर काम करताना तसेच तेथून परतल्यानंतर या बालकांचे आरोग्य अबाधित राहावे तसेच कुपोषणाचे शिकार बनू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राज्यात व राज्याबाहेर गेलेल्या बालकांना संदर्भ सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये स्थलांतर करतात. यावर्षी स्थलांतर केलेल्या कामगारांसोबत त्यांची १३ हजार ६६९ मुले आहेत. स्थलांतराच्या कालावधीत व तेथून परतल्यानंतर मुलांमधील कुपोषणाचा आलेख वाढतो. हे रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ट्रेकिंग सिस्टीम तयार केली. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गाव, क्षेत्रनिहाय सर्वेक्षणाद्वारे ० ते ६ वयोगटातील बालकांची वैयक्तिक माहिती संकलित करण्यात आली. या सर्वेक्षणातून माहिती संकलित केल्यानंतर राज्यातील सात जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्राद्वारे बीडचे सीईओ अजित कुंभार यांनी संपर्क साधून जिल्ह्यातील स्थलांतरित बालकांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कळविले.

बीड जिल्ह्यांतर्गत ६४५, पुणे जिल्ह्यात १०१९, लातूर १५१, उस्मानाबाद १९०, अहमदनगर ३८६, सांगली १११०, काेल्हापूर १३१० ,सातारा १३४७, जालना ७३, सोलापूर १३०५,परभणी ६३ तसेच महाराष्ट्रातील इतर शहरे, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये एकूण १३ हजार ६६९ बालकांचे स्थलांतर झाले आहे.

एकात्मिक विकास योजनेचा मिळणार लाभ

संबंधित जिल्ह्यातील कोणत्या कारखान्यावर अथवा इतर कामांच्या ठिकाणी ही बालके असतील, तसेच त्यांच्या आरोग्यविषयक संदर्भाबाबत माहिती तेथील प्रशासनाला कळविण्यात आली.त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत शासन नियमानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा या स्थलांतरित बालकांना योजनेचा लाभ मिळणे सुलभ होत आहे.

कर्नाटकमध्ये ५६६७ बालके

जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये स्थलांतर झालेल्या बालकांची संख्या ५ हजार ६६७ इतकी असून कर्नाटकमधील प्रशासनाला कळविण्यासाठी या बालकांची संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेत तयार करावी लागली. प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे व सहकाऱ्यांनी आठवडाभर परिश्रम घेतले. कर्नाटकचे प्रधान सचिवांना कळविण्यासाठी बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी महाराष्ट्राच्या प्रधान सचिव कुंदन यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.