शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 12:54 IST

साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली.

ठळक मुद्देबाबासाहेब पुरंदरे व्यासपीठावर निमंत्रितांच्या ‘जंबोजेट’ कविसंमेलनात ५० कवींनी विक्रमी सहभाग नोंदविला.शिक्षकांसाठी स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. 

- मल्हारीकांत देशमुख

अंबाजोगाई (स्वामी रामानंद तीर्थ नगरी) : बाबासाहेब पुरंदरे व्यासपीठावर निमंत्रितांच्या ‘जंबोजेट’ कविसंमेलनात ५० कवींनी विक्रमी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ कवी जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली.

मेहनत न करणार्‍यांचंरान कसं पिकलंम्हणून विचारतो जोतिबा गणित कुठं चुकलं?

अध्यक्षस्थानावरून जगदीश कदम यांनी पहिली कविता सादर केली. त्यानंतर सोपान हाळमकर यांनी ‘संवेदना’, तर भगवान अंजर्णीकर यांनी ‘काजव्यांचा दीपोत्सव’, राजेश दिवेकर यांनी ‘अपेक्षांचे ओझे’ या कविता सादर केल्या.

‘माय बाप भंगारात खाण्यासाठी झुरतातवाट पाहत मरणाची कसेबसे जगतातवरवरचे बदल केवळ ही रंगरंगोटीवेळप्रसंगी दिसते आतली लंगोटी’

बदलत्या समाज जीवनावर केशव बा. वसेकर यांनी ताशेरे ओढले. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या ‘भ्रष्टाचार’ या विनोदी कवितेला उपस्थितांनी दाद दिली. मीरा निसळे, शशिकांत हिंगोणेकर यांच्या सामाजिक आशयावरील कविता, तर वीरा राठोड यांच्या खास बीडच्या शैलीत सादर करण्यात आलेल्या राजकीय व्यंगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणेस्वत:च आपली राख उधळीत जाणेनारायण पुरी यांची ही कविता उल्लेखनीय ठरली. बालाजी इंगळे, चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या कविता रसिकांना अंतर्मुख करून गेल्या. स्त्रियांची होणारी घुसमट व्यक्त करणार्‍या रंजना कंधारकर, आशा डांगे यांच्या कवितांनी वातावरण गंभीर केले. 

या पार्श्वभूमीवर डी.के. शेख यांच्या राजकीय व्यंगावर हंशा पिकला. अंकुश नेणगीकर यांच्या ‘सावित्रीच्या लेकी’ तर प्रिया धारूरकर, संजय धाडगे यांच्या कविता वेगळ्या वळणाच्या होत्या.

‘आली जवळ दोघे प्रेमपणाच्या ओढीनंदूर डोलीत बसलीराघू नि मैना जोडीनं’

पंजाब मोरे यांच्या रचनेला श्रोत्यांनी टाळ्याने दाद दिली.पैठण येथील संदीप जगदाळे  यांनी कवितेतून मांडलेली शाळाबाह्य विद्यार्थ्यांची व्यथा, तर रमेश कदम यांची ‘कॉर्पोरेट शाळा’ ही कविता मनाला भिडवून गेली. शिवाजी मेनकुदळे यांचे ‘पेरणी गीत’ उपस्थितांची दाद मिळवून गेले. सत्यप्रेम लगड यांची पाणंदमुक्तीवरची व्यंगात्मक कविता वातावरण हलकेफुलके करून गेली.

कविसंमेलनासाठी गोव्यावरून आलेल्या चित्रा क्षीरसागर या कवयित्रीने

‘पोरी ऋतू नसताना उमलत चालल्यातबिनापानाच्या चाफ्यासारखं फुलत चालल्यात’

हे कटू सत्य मांडले. सुरेश हिवाळे यांची ‘प्रार्थना’ मनाला भिडणारी होती. व्यासपीठावर तब्बल पन्नास कवी असल्याने कविसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार्‍या कवी नीलेश चव्हाण यांना फार मोठी कसरत करावी लागली. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती.

शिक्षक कविसंमेलनात शेतकर्‍यांचे दु:ख उजागर

शिक्षकांसाठी स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. 

‘मी नभाला पुसलेआता माझे ओले डोळेझेलीत बसलो मातीमधून दुष्काळी हिंदोळे’

या कवितेने श्रोत्यांंना अंतर्मुख केले. कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांचे कविसंमेलन शैला लोहिया  व्यासपीठावर पार पडले. संमेलनाच्या प्रारंभी साळेगावकर यांनी ‘सारंच आभाळ टारगट झालंय’ ही शेतकर्‍यांच्या स्वप्नातील पावसाविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर विलास डिग्गीकरांची

‘पाऊस  मिरगसरीने निघून जातो पाऊस काळजीवनाची भाषा लिहितो, शेती नांगराचा फाळ’

ही कविता रसिकांची दाद मिळवून गेली. यानंतर दिनकर जोशी, सूर्यकांत डोळसे, उमेश मोहिते, अनंत कराड, गणपत व्यास, शरद रांजवण, राजेंद्र लाड, जनार्दन सोनवणे, संगीता सपकाळ, सुरेखा खेडकर आदी कवींंनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्र संचालन अरुण पवार यांनी केले.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य