शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 19:09 IST

एकही उमेदवार अर्ज भरणार नाही, उमरी ग्रामस्थांनी केला एकमुखी ठराव

माजलगाव (बीड) : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नाही, अशी भूमिका घेत उमरी ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले.निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, असे लेखी निवेदन तहसीलदार यांना ग्रामस्थांनी दिले आहे.

उमरी येथील आज सकाळी ११ वाजता ग्रामस्थ,पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. यात एकमुखी ठराव घेतला की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार असेल. गावातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल करायचा नाही. अशा  प्रकारे ठराव घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे उमरी ही गाव राज्यातील एकमेव ठरले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित करा, जर निवडणुका घेतल्या तर उमरी येथील एकही उमेदवार निवडणूकीत उमेदवारी दाखल करणार नसल्याचा निवेदन उमरी ग्रामस्थांनी दिले. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दोन दिवसानंतरही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. 

गाव पातळीवर निर्णय घ्यावातालुक्यातील ४२ ग्रामपंचायतचा  निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.गावातील उमेदवारांनी गाव पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढवावी. राजकारणामध्ये कधीही मराठा क्रांती मोर्चा सामील झाला नाही व सामील होणार नाही. - राजेंद्र होके पाटील, मराठा क्रांती मोर्चा बीड

लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावेराज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांनी सहभाग नोंदवावा. निवडणुका ठरवलेल्या वेळेतच होत असतात. निवडणुकीवर बहिष्कार न टाकता सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन लोंकानी निवडणुका लढवाव्यात.-वर्षा मनाळे, तहसीलदार माजलगाव

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत