शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यात किसान योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एक वर्षाच्या अंतरात तीन टप्प्यांत २ हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ...

अंबाजोगाई : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एक वर्षाच्या अंतरात तीन टप्प्यांत २ हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. त्याअनुषंगाने यावर्षी अंबाजोगाई व परिसरातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर, अनेक शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित आहेत.

एकीकडे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, असे जाहीर करून खात्यात जमा झालेले पैसे परत करण्याच्या नोटिसा दिल्या. मात्र, त्यानंतरही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा २००० रुपये जमा करण्यात आले. हा प्रशासनाचा सावळागोंधळ असून प्रशासन शेतकऱ्यांप्रति किती जागरूक आहे, याचा प्रत्यय येत आहे. दीड महिन्याचा कालावधी लोटला असूनही अंबाजोगाई व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झालेले नाहीत. या संदर्भात तहसील कार्यालयात चौकशी केली असता पंतप्रधान किसान योजनेचे काम आता कृषी विभागाकडे दिले आहे. तेथे जाऊन तक्रार करा. तर, कृषी विभागाकडून असा कुठलाही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही कार्यालयांचे उंबरठे झिजवून हताश शेतकरी आता दाद मागावी तरी कुणाकडे? अशा विवंचनेत आहेत.

...

शेतक-यांना न्याय द्यावा

पी.एम. किसान योजनेचे काम तहसीलकडेच होते. काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात याबाबत अर्जदेखील केला. मात्र, कुणीही या प्रकरणाची चौकशी करून दखल घेण्यास तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीच आता याची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.