शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

माजलगाव तालुका कृषी विभाग रिक्त पदांमुळे सलाईनवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 19:54 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला अतोनात त्रास

ठळक मुद्देशेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तीन मंडळांत ६७ जागा रिक्त

- राजाभाऊ पास्टेगंगामसला (बीड ) : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या पद रिक्ततेमुळे शेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. 

माजलगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील १३ जागांसह तालुक्यातील तीन कृषी मंडळामध्ये २९ जागा रिक्त आहेत. यात मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या ३ पैकी २ जागांचा तर कृषी सहाय्यकांच्या २२ जागांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. एकूण ६७ पदांपैकी २५ पदे भरलेली असून ४२ पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण ६७ पदांपैकी ४२ पदे रिक्त असल्यामुळे आता खरीप हंगाम आहे. मात्र कृषी विभाग सलाईनवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अशी आहेत रिक्त पदेतालुका कृषी कार्यालय २२ विविध पदे, १३ पदे रिक्त आहेत, सहायक अधीक्षक १, कृषी सहायक १, कृषी पर्यवेक्षक १,  लिपिक ३, अनुरेखक २, जीप चालक १, शिपाई ४, कृषी मंडळ माजलगाव १५ पदे मंजूर, रिक्त पदे ९, कृषी पर्यवेक्षक १, कृषी सहायक ८,  कृषी मंडळ गंगामसला १५ पदे मंजूर, रिक्त पदे ८, कृषी अधिकारी १, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ५ रिक्त आहेत, कृषी मंडळ केसापुरी १५ पदे मंजूर, रिक्त पदे १२, कृषी अधिकारी १, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ९ जागा रिक्त आहेत.

६७ जागांना शासनाची मंजूरी

माजलगाव तालुका दुष्काळी असल्यामुळे येथील शेतकरी दृष्काळाशी नेहमी संघर्ष करीत आहे. या परिस्थितीत येथील कृषी विभाग मात्र सलाईनवर आहे. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी तालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह तीन कृषी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माजलगाव, गंगामसला, केसापुरी या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात एकूण ६७ जागांना शासनाची मंजूरी आहे. तालुका कार्यालयातील १३ व माजलगाव मंडळ ९, गंगामसला मंडळ ८, केसापुरी मंडळ १२ अशा  एकूण ४२ जागांची आवश्यकता आहे. माजलगाव, गंगामसला मंडळासह  सर्वाधिक जागा केसापुरी मंडळात रिक्त असल्याने त्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून, यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहवे लागत आहे. रिक्त जागांमुळे माजलगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील १३ जागांसह तालुक्यातील तीन कृषी मंडळात २९ जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त असल्यामुळे शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंगतालुक्यात मंडळ कृषी अधिकाऱ्यांची ३ पदे असून गंगामसला व केसापुरी येथील पदे रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयात असलेले एकमेव सहायक अधीक्षकांचे पद देखील रिक्त आहे. तसेच लिपिकपदाच्या ५ जागा मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाने आणलेल्या नवीन योजनांची माहिती पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम असलेल्या कृषी सहाय्यकांच्या ३७ पदांपैकी २३ पदे रिक्त आहेत, त्यामुळे शासनाच्या कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचत नाही. शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे नेण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंग लागल्याची स्थिती तालुक्यात झालेली आहे. शेतकरी अनेक योजनांबाबात अनभिज्ञ आहेत. शासनाकडून नोकर भरती बंद असल्याचा फटका कृषी कार्यालयाला बसत आहे.

तीन मंडळांत ६७ जागा रिक्ततालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह तीन कृषी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माजलगाव, गंगामसला, केसापुरी या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात ६७ जागांना शासनाची मंजुरी आहे. तालुका कार्यालयातील १३ व माजलगाव मंडळ ९, गंगामसला मंडळ ८, केसापुरी मंडळ १२ अशा एकूण ४२ जागांची आवश्यक आहे. माजलगाव, गंगामसला मंडळासह सर्वाधिक जागा केसापुरी मंडळात रिक्त असल्याने त्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून, यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड