शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:14 IST

जिवंत साठ्यात येण्यासाठी २ मिटर पाण्याची आवश्यकता

ठळक मुद्देअनेक वेळा परतीच्या पावसावर भरले होते धरणअडीच महिन्यात केवळ दिड मिटरच वाढली पाणी पातळी

- पुरूषोत्तम करवामाजलगाव :परतीचा पाऊस सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना येथील माजलगाव धरणाची पाणी पातळी जिवंत साठयात येण्यासाठी दोन मिटर पाणी पातळीची आवश्यकता असुन अनेक वेळा हे धरण परतीच्या पावसाने भरले होते त्यामुळे हे धरण परतीच्या पावसावर भरेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.

गेल्यावर्षी माजलगाव धरण परिसरात अत्यल्प पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढे पाणी लागते.३० जुन रोजी या धरणाची पाणी पातळी ४२३.०० मीटर ऐवढी झाली होती. यावेळी धरणात ६६ दलघमी ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता.या धरणात ४५४ दलघमी ऐवढा पाणी साठा आवश्यक असतो.मागील आठ दिवसात धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस झाल्याने व पैठण येथील जायकवाडी धरणातुन १३ ऑगस्टपासुन सोडण्यात आल्याने ९४.४० दलघमी ऐवढा पाणी साठा शुक्रवारी सकाळी झाला होता.तर ४२४.३८  मीटर ऐवढी पाणी पातळी धरणात झाली होती.

हे धरण टक्केवारी येण्यासाठी ४२६.११ मीटर ऐवढा पाणी साठा आवश्यक असल्याने अद्याप हे धरण टक्केवारीत येण्यासाठी १.७३ मीटर पाणी आवश्यक आहे. धरणाची पाणी पातळी अद्याप १५.२६ टक्यांनी खालावलेलीच आहे. तर हे धरण भरण्यासाठी अद्याप ७.४२  मीटर पाण्याची आवश्यकता आहे.धरणात शुक्रवारी ७०० क्युसेक ऐवढी आवक होती.तर ३७ दलघमी ऐवढे पाणी आजपर्यंत धरणात आले आहे त्यात २२ दलघमी पाणी हे पैठण येथील जायकवाडी धरणातुन आले आहे तर १५ दलघमी पाणी केवळ पावसाचे असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.

परतीच्या पावसाची आशामागील दहा वर्षात अनेक वेळा माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. मात्र , अनेक वेळा परतीच्या दोन-तीन पावसातच हे धरण भरले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी हे धरण परतीच्या पावसावर भरेल अशी आशा शेतकरी वर्गातून होत आहे. हवामान खात्याने या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल अशी आशा व्यक्त केल्याने हे धरण नक्कीच भरेल अशी आस सर्वांना लागली आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसBeedबीड