शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बीडमध्ये महावितरण टपलयं जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:48 IST

बीड शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देतारा लोंबकळल्या, खांबही वाकले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते. नागरिकांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्यानंतरही महावितरण याची दुरुस्ती करण्यास उदासिन असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ही गंभीर परिस्थिती पाहता ‘महावितरण टपलंय जिवावर’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. महावितरण मात्र याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांचे कान उपटले होते. त्यानंतर तरी यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप यामध्ये काहीच बदल झालेले दिसून येत नाहीत. महावितरण अधिकाºयांच्या हालगर्जीपणाच आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात घडण्यापूर्वीच अधिका-यांनी सर्व दुरूस्ती करून घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, शहरातील वाकलेले खांब, लोंबकाळलेल्या तारा दुरूस्तीसह रोहित्रांच्या दुरूस्तीसाठी गुत्तेदार नेमले आहेत. परंतु अधिकाºयांना हाताशी धरून हे गुत्तेदार कामच करीत नसल्याचे दिसते. केलेले कामेही दर्जेदार होत नसल्यानेच शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिका-यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

अनेकांच्या शेतांमधून वीजपुरवठा करणारे खांब गेलेले आहेत. हे खांब वाकलेले असून, स्पार्किंगमुळे पीक जळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.जुन्या तारा झाल्या जीर्णबीड शहरातील बहुतांश भागातील तारा अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या जिर्ण झाल्या आहेत. याचा परिणाम थोडेही वारे आले किंवा पाऊस आला की त्या तुटून पडतात. यामुळे अपघात घडतात. अशा घटना घडल्याची अनेक उदाहरणेही आहेत.

धोकादायक बॉक्सबीड शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे वायरचे बॉक्स उघडे आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहयोनगरात प्रेस लाईन परिसरातील हे त्याचे बोलके छायाचित्र दिसत आहे.

रोहित्रांना पडला वेलीचा विळखाबीड शहरात ठिकठिकाणी रोहित्रे आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रोहित्रांवर वेलींचा विळखा पाहवयास मिळतो. यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येत आहेत. बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात या रोहित्रावर अशा प्रकारे वेलींनी विळखा घातलेला आहे.

दुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्चयावर्षी मेंटेनन्ससाठी तब्बल साडे बारा कोटी रूपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे. या आकडेवारी गतवर्षीही दुरूस्तीसाठी कोट्यवधी रूपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रूपये खर्चुनही शहरातील परिस्थिती जैसे थे च असल्याचे दिसते. यावरून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

अधिकारी, गुत्तेदारांचे संगणमत !महाविरणची कामे करण्यास मागील अनेक वर्षांपासून ठरावीक गुत्तेदारच आहेत. त्यांची आणि अधिका-यांची चांगली ओळख असल्याने ते त्यांना बदलत नाहीत. या ओळखीचा फायदा घेत गुत्तेदार दर्जेदार कामे करीत नाहीत. यामुळे अपघात घडतात. अधिकारीही निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

खांब सरळ करण्यास नाही वेळशहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खांब आहेत. त्यामुळे वाहनांच्या घडकेने अथवा इतर अपघातामुळे ते वाकतात. यामुळे वीज पुरवठ्यात अडथळे येतात. असे असतानाही महावितरण याकडे दुर्लक्ष करते.जुने खांब बदलने तर दुरच परंतु वाकलेले खांब सरळ करायलाही महावितरणला वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.