शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये महावितरण टपलयं जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:48 IST

बीड शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देतारा लोंबकळल्या, खांबही वाकले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते. नागरिकांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्यानंतरही महावितरण याची दुरुस्ती करण्यास उदासिन असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ही गंभीर परिस्थिती पाहता ‘महावितरण टपलंय जिवावर’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. महावितरण मात्र याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांचे कान उपटले होते. त्यानंतर तरी यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप यामध्ये काहीच बदल झालेले दिसून येत नाहीत. महावितरण अधिकाºयांच्या हालगर्जीपणाच आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात घडण्यापूर्वीच अधिका-यांनी सर्व दुरूस्ती करून घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, शहरातील वाकलेले खांब, लोंबकाळलेल्या तारा दुरूस्तीसह रोहित्रांच्या दुरूस्तीसाठी गुत्तेदार नेमले आहेत. परंतु अधिकाºयांना हाताशी धरून हे गुत्तेदार कामच करीत नसल्याचे दिसते. केलेले कामेही दर्जेदार होत नसल्यानेच शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिका-यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

अनेकांच्या शेतांमधून वीजपुरवठा करणारे खांब गेलेले आहेत. हे खांब वाकलेले असून, स्पार्किंगमुळे पीक जळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.जुन्या तारा झाल्या जीर्णबीड शहरातील बहुतांश भागातील तारा अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या जिर्ण झाल्या आहेत. याचा परिणाम थोडेही वारे आले किंवा पाऊस आला की त्या तुटून पडतात. यामुळे अपघात घडतात. अशा घटना घडल्याची अनेक उदाहरणेही आहेत.

धोकादायक बॉक्सबीड शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे वायरचे बॉक्स उघडे आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहयोनगरात प्रेस लाईन परिसरातील हे त्याचे बोलके छायाचित्र दिसत आहे.

रोहित्रांना पडला वेलीचा विळखाबीड शहरात ठिकठिकाणी रोहित्रे आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रोहित्रांवर वेलींचा विळखा पाहवयास मिळतो. यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येत आहेत. बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात या रोहित्रावर अशा प्रकारे वेलींनी विळखा घातलेला आहे.

दुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्चयावर्षी मेंटेनन्ससाठी तब्बल साडे बारा कोटी रूपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे. या आकडेवारी गतवर्षीही दुरूस्तीसाठी कोट्यवधी रूपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रूपये खर्चुनही शहरातील परिस्थिती जैसे थे च असल्याचे दिसते. यावरून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

अधिकारी, गुत्तेदारांचे संगणमत !महाविरणची कामे करण्यास मागील अनेक वर्षांपासून ठरावीक गुत्तेदारच आहेत. त्यांची आणि अधिका-यांची चांगली ओळख असल्याने ते त्यांना बदलत नाहीत. या ओळखीचा फायदा घेत गुत्तेदार दर्जेदार कामे करीत नाहीत. यामुळे अपघात घडतात. अधिकारीही निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

खांब सरळ करण्यास नाही वेळशहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खांब आहेत. त्यामुळे वाहनांच्या घडकेने अथवा इतर अपघातामुळे ते वाकतात. यामुळे वीज पुरवठ्यात अडथळे येतात. असे असतानाही महावितरण याकडे दुर्लक्ष करते.जुने खांब बदलने तर दुरच परंतु वाकलेले खांब सरळ करायलाही महावितरणला वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.