शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी दोन ट्रस्टींवर डागली तोफ, गंभीर आरोपांनी वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:17 IST

ट्रस्टी बळीराम गवते, सीए जाधव यांच्यावर महंत शिवाजी महाराजांनी केले गंभीर आरोप

बीड : धाकटी पंढरी म्हणून राज्यभरात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाचा वाद आता पेटला आहे. महंत शिवाजी महाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विश्वस्त बळीराम गवते आणि सीए बी. बी. जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. २५ कोटी रुपयांच्या कामासाठी या दोघांनी गडाची बदनामी केली. तसेच पुतळा बसविण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप त्यांनी केला, तर हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा गवते आणि जाधव यांनी केला असून, दोन दिवसांत सर्व पुरावे देऊ, असे सांगितले. परंतु लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धाकट्या पंढरीचा वाद पेटल्याने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

दि. ११ मार्च २०२५ रोजी नगर नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महंत शिवाजी महाराज यांनी आपले भाचे महंत संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर १५ दिवसांपासून त्यावरून धुसफूस सुरू होती. नारायणगडावर या संदर्भात बैठक घेऊन संभाजी महाराज यांच्या नियुक्तीला विरोधही करण्यात आला होता. तेव्हापासून हा गड चर्चेत आला होता. आता याच सर्व वादावर खुद्द महंत शिवाजी महाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गडाची बदनामी भक्तांनी नव्हे तर आपणच नियुक्त केलेल्या विश्वस्तांनी केली. यात त्यांनी गवते आणि जाधव यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. आता हे दोन्ही विश्वस्तही या आरोपांना उत्तर देणार असल्याने हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

भक्तांनी शिव्या, जोडे मारले तरी गप्प बसेलगडाची बदनामी कोणी भक्त करत नसून ट्रस्टी करत आहेत. भक्तांनी शिव्या दिल्या जोडे मारले तरी मी वर पाहणार नाही. पण जे ट्रस्टी नेमले त्यांनीच आरोप, घाणाघात केला. १५ दिवसांपासून जेवलो, झोपलो का हे सुद्धा कोणी विचारले नाही. मी व्यथित झालो. मला हे सहन होत नसल्यानेच माध्यमांसमोर आल्याचे महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले. महादेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भक्तांची गर्दी येथे जमली होती.

विश्वस्त माळकरी असावेतयापुढे गडाचे विश्वस्त हे माळकरी असावेत. आतापर्यंत दबावामुळे मी गप्प होतो, कारण हे परमार्थाचे क्षेत्र आहे. पण आता शांत बसणार नाही. यापुढे गडाशी जोडलेल्या प्रत्येक गावातून दोन मुले असे १०० मुले गडाचे काम पाहतील. जर कोणी मध्ये बोलले तर हीच मुले कारवाई करतील, असा दावाही महंत शिवाजी महाराजांनी केला.

२५ कोटींच्या कामासाठी धडपडस्व.विनायक मेटे यांनी गडासाठी २५ कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु तो आपणच आणला असून हे कामे आम्हालाच मिळावी, असे जाधव, गवते यांना वाटत होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पैसे जमा केले, परंतु तो अद्यापही बसवला नाही, असा आरोप महंत शिवाजी महाराज यांनी केला. जाधव यांनी ऑडिट केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गवते, जाधव काय म्हणतात?महंत शिवाजी महाराज यांच्या आरोपानंतर जाधव आणि गवते यांनीही संवाद साधला. हे आरोप तथ्यहीन असून, महाराज कोणाच्या दबावाखाली बोलले, याचा शाेध घ्यायला हवा. ऑडिट, पुतळा, टेंडरचे सर्व पुरावे आहेत. पुढील दोन दिवसांत माध्यमांसमोर सर्व पुरावे देऊ, असा दावा या दोघांनीही केला. आम्ही पिढ्यानपिढ्या गडाची सेवा करतोत. आमच्यावर हे आरोप आजच का केले? का कोणी करायला लावले? यामागे कोण आहे? याचा शोध घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीड