शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कामखेड्यात २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:48 IST

तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ठळक मुद्देलोकार्पण : क्लायमेट रियालिटी व मॅप्स संस्थेचा उपक्रम, ग्रामस्थांचे सहकार्य; रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे गावातील पाणी टंचाईवर होणार मात

बीड : तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उभारलेल्या यंत्रणेचे सोमवारी एका कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.यावेळी आ. लक्ष्मण पवार, क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडियाचे अध्यक्ष आदित्य पुंडीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, मॅप्स इंडस्ट्रीजचे एम. डी. अनिरुद्ध तोडकर आदी उपस्थित होते.गणेश नेवडे यांनी माहिती देत हा उपक्रम राबविल्याबद्दल निवृत कर्नल शशिकांत दळवी व अनिरु द्ध तोडकर तसेच त्यांचे सहकारी गोरख वाघमारे यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केले. हा उपक्रम गावातील सर्व बोअरवेलवर हा राबवल्यानंतर गावाची पाण्याच समस्या कायमची दूर होऊ शकते, त्यासाठी आ. पवार यांच्याकडे निधीची मागणी त्यांनी केली.आ. लक्ष्मण पवार यांनी गावातील टॅँकरच्या फेºयांमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच उर्वरित कामासाठी निधी देण्याच्या मागणीवर विचार करू असे सांगितले. कामखेडा येथे राज्यातील पहिला उपक्रम सुरु केला. कामखेडा व गेवराई तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. निवृत्त कर्नल शशिकांत दळवी व अनिरुद्ध तोडकर यांनी या भागातील पाण्याचे संकट कायमचे दूर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल उचलल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्र म इतर गावांमध्ये सुरु करण्यावर आ. पवार यांनी जोर दिला. सततच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी असा उपक्रम राबविलेले बीड जिल्ह्यातील कामखेडा हे राज्यातील पहिले गाव असल्याचे सांगून निवृत्त कर्नल दळवी यांनी या उपयुक्त पध्दतीची माहिती दिली.कामखेडा होणार टॅँकरमुक्तकामखेडा येथे जवळपास ६५० इमारती आहेत, ज्यांच्या ५.२६ लाख चौरस फूट छतावरुन जवळपास ३.१५ कोटी लिटर पावसाचे पाणी भूगर्भात सोडून, भूगर्भातील पाण्याची पातळी अशा उपक्रमातून वाढविता येईल तसेच गाव कायमचे टॅँकरमुक्त हाईल, असे कर्नल दळवी म्हणाले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई