शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

‘बर्ड फ्लू’च्या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबडीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ आर्थिक ...

बीड : बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबडीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

शेतीला जोड धंदा म्हणून बीड जिल्ह्यातील लहान शेतकरी व तरुण कोंबडी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. बर्ड फ्लूच्या केवळ अफवेमुळे आज ७० ते ७५ रुपये किलोने तयार होणारी कोंबडी ३० ते ४० रुपये किलोने विक्री करण्याची वेळ कुक्कुटपालकांवर आली आहे. पर्यायाने हा व्यवसाय मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: बिघडली असून, यापूर्वीही कोरोनाच्या अफवेमुळे १० ते २० रुपये किलो दराने कोंबडी विकली होती. मागील काही दिवसांपासून बाजार सुधारला होता, तर आता बर्ड फ्लूच्या संकटामुळे आम्ही कोंबडी उत्पादक फक्त अफवेचेच बळी ठरत आहेात. सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. यावेळी गणेश राऊत, अजीज कुरेशी, बालू सालगुडे,नीलेश मस्के, हरून पठाण ,शेख निसार, सचिन जगताप, गणेश ढोरमारे, विष्णू लहाने ,अनिल शिंदे, राज महंमद, शेख नदीम , सतीश सालगुडे , राज बागलाने, शिवाजी साखरे , बाळू जगताप , यांच्यासह भांडारवाडी , नेकनूर , अंधापुरी, पालवन , कलसंबर, मांजरसुबा याठिकाणचे शेतकरी उपस्थित होते.