शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भार वाढला, उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:39 IST

मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसततच्या दुष्काळामुळे अस्थिरता वाढली : कष्टकऱ्यांच्या जिल्ह्यात स्थायी रोजगाराचा अभाव

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दर दोन वर्षांनी दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्याला करावा लागत आहे. केवळ शेतीवर आधारित येथील व्यापार उदीम असल्याने त्याचा प्रत्येक घयकावर तसेच मानवी जीवनमानावर परिणाम झाला आहे. २०१०-११ च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८५ हजार ४९ इतकी होती. आठ वर्षांचा आढावा घेतला असता यात जवळपास अडीच लाखांची वाढ झाल्याचे दिसते. लोकसंख्या वाढत असताना गुणवत्तेचे दोन- चार घटक सोडले तर अनेक समस्यांचा आलेख वाढत आहे.मागील आठ वर्षात शाश्वत रोजगार निर्मिती न झाल्याने बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच वर्षात शेती उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे दिसून येते. पुरेसे पर्जन्यमान नसल्याने अन्नधान्याचे उत्पादन घटले. त्याचबरोबर पाणी टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. शेतजमिनीचा निवासी वापर वाढल्याने शेतजमीन क्षेत्र घटले. निवासी वापराचा भार वाढत चालला आहे. महागाई तसेच चारा टंचाई, कमी पाऊस यामुळे पशूधन सांभाळणे कठीण झाल्याने पशुधनांची संख्या घटत आहे. रोजगाराचा अभाव असल्याने कामकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.रेडीरेकनर (बीड शहर)डिसेंबर २०१८ पर्यंत बीड शहरात एकूण मालमत्तेची संख्या ५६ हजार इतकी आहे. यात खुली जमीन, घरे, कार्यालये, संकुल, मैदान आदींचा समावेश आहे. शहरातील घरांची संख्या ४३ हजार ३८० इतकी आहे.२०१०-११ मध्ये दस्त नोंदणी ५६ हजार ५८६ झाली. उद्दिष्ट ५० कोटी तर वसुली ५७.४८ कोटी इतकी झाली. २०१८-१९ मध्ये दस्त संख्या ४६ हजार ८०२ झाली. १०८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. १२१.०२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. खरेदी- विक्री, गहाण, बक्षीस, भोडपट्टे, वाटपपत्र आदींचा समावेश आहे.सुभाष रोड : २०११ मध्ये खुली जमीन ९ हजार रुपये तर निवासी ९ हजार २०० रुपये प्रती चौ मीटर २०१९ मध्ये २४ हजार ७०० रुपये प्रती चौ. मीटर खुली जमीन तर निवासी ३५ हजार रुपये चौ. मीटर.जिजामाता चौक ते सुभाष रोड : खुली जमीन २०११ मध्ये ५८०० तर निवासी ८८०० रुपये प्र. चौ. फूट. / २०१९ मध्ये खुली जमीन १६ हजार रुपये चौ. मी. तर निवासी २६ हजार रुपये प्रती चौ. मीटरशिवाजी पुतळा ते राजुरी वेस : खुली जमीन ६७०० रुपये २०११ मध्ये होती ती आज १८५०० रुपये चौ. फूट आहे. २०११ मध्ये निवासी ८८०० तर सद्या २७ हजार रुपये आहे.सम्राट हॉटेल ते शाहू नगर :२०११ मध्ये खुली जमीन ४४०० तर २०१९ मध्ये ११२००, २०११ मध्ये निवासी ९२०० तर सध्या २१ हजारजालना रोड ते मोंढा : २०११ मध्ये खुली जमीन ९ हजार ५०० रपये चौ फूट तर सध्या २४ हजार रुपये आहे. निवासी जमीन २०११ मध्ये ९ हजार २०० आज ३४ हजार ५०० रुपये आहे.बार्शी रस्ता : २०११ मध्ये खुली जमीन ५ हजार २०० तर निवासी ९ हजार २०० रुपये होती. २०१९ मध्ये खुली जमीन १३५०० तर निवासी २४ हजार रुपये आहे.

टॅग्स :Beedबीड