शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दावणीचे पशुधन छावणीच्या आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:26 IST

तीव्र दुष्काळाचा परिणाम मुक्या जनावरांवर हो नये यासाठी तालुक्यातून आलेल्या जवळपास ४० प्रस्तावांपैकी ८ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची तीव्र पडछाया : ४० दाखल प्रस्तावांपैकी ७ छावण्यांमध्ये ३२६२ जनावरे दाखल; छावण्यांची संख्या वाढणार

शिरूर कासार : तीव्र दुष्काळाचा परिणाम मुक्या जनावरांवर हो नये यासाठी तालुक्यातून आलेल्या जवळपास ४० प्रस्तावांपैकी ८ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ७ छावण्यांमध्ये ३२६२ जनावरे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून उपासमार सहन केलेले पशूधन अखेर छावणीच्या आश्रयाला दाखल झाले. एक छावणी एक - दोन दिवसात सुरू होईल, तर आणखी काही छावण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर सुरु होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आलीे.तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांना पशुधन जगवण्याचे मोठे आव्हान होते. छावण्या सुरु करा अशी मागणी जोर धरीत होती. मात्र, चारा दावणीवर की छावणीवर हा निर्णय होण्यास विलंब होत गेला. परिणामी शेतकऱ्यांना तालुक्याबाहेरहून चारा विकत आणावा लागला. भाव गगनाला भिडले असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आणि जनावरांना अर्धपोटी रहावे लागले होते.तालुक्यात कुठेच पाणी नसल्याने पाणी पाजायचे कुठे हा आणखी जटील प्रश्न निर्माण झाला. दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता कुठे छावण्याचे दरवाजे उघडले जाऊ लागले असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. यापूर्वी छावण्यावरचा कडू - गोड अनुभव घेतला तरी आता त्यांच्या अन्य पर्यायच नसल्याने दावणीवरच्या खुंट्या रिकाम्या करत जवळच्या छावणीला पसंती देत शेतकरी मुक्कामी गेला आहे.आता ऊसतोड मजूर आपल्या जनावरासह गावी परतू लागले आहेत. सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे मुक्या जनावरांना जगविण्यासाठी त्यांना घरच्या दावणीऐवजी छावणीवरच आश्रय घेणे क्रमप्राप्त आहे. उन्हाचा वाढता जोर पशुधनासाठी त्रासदायक ठरणार आहे. तकलादू सावली हाच एकमेव आधार आहे तर पिण्याचे पाणी भरपूर मिळणे गरजेचे आहे. नियमाप्रमाणे चारा पाणी वेळेवर मिळाले पाहिजे इतकी माफक अपेक्षा केली जात आहे.दुष्काळाची दाहकता ओळखून शासन नियमाचे काटेकोर पालन करण्याचे बंधन छावणी चालकांचे आहे. त्यासाठी वेळोवेळी तपासणी सुरु राहील. चारा पाणी याबाबत शेतकºयांना वेठीस धरले जाणार नाही आणि तसे निदर्शनास आल्यास छावणी चालकांना कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे तहसीलदार प्रिया सुळे यांनी सांगितले. पशुधनाची संख्याची सत्यता पडताळली जाईल. कुठेही हेराफेरी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र