शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोबाईलवरून मिळायचा खुनाचा ‘लाईव्ह रिपोर्ट !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:49 IST

सुमित वाघमारे या युवकाचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुमित वाघमारे या युवकाचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे. कट रचणाऱ्या कृष्णा क्षीरसागर याला बीड पोलिसांनी सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. घटनास्थळावरचा लाईव्ह रिपोर्ट एका मोबाईलवरुन कृष्णाला मिळत होता हे तपासातून समोर आले आहे. तसेच यातील मुख्य आरोपी मात्र अद्यापही मोकाटच आहेत.१९ डिसेंबर रोजी बीड शहरातील तेलगाव नाक्यावर भाग्यश्री व सुमित वाघमारे हे दाम्पत्य अभियांत्रिकीची परीक्षा देऊन घरी निघाले होते. एवढ्यात भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत वाघ हे कारमधून आले.काही समजण्याच्या आतच भाग्यश्रीला दुचाकीवरुन ढकलत सुमितवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये सुमित जागेवरच कोसळला अन् ठार झाला. त्यानंतर दोघांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच पथके नियुक्त केली होती.मुख्य आरोपी बालाजी व संकेत हे अद्यापही मोकाटच असले तरी हा खून पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. बालाजीचा मामेभाऊ कृष्णा क्षीरसागर हा यामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात कृष्णाच बालाजी व संकेतला सूचना करीत होता. घटनेवेळी कृष्णाला अन्य एक आरोपी मोबाईलवरुन संपूर्ण माहिती देत होता. खून झाल्यानंतर चौथ्या आरोपीने मुख्य आरोपींना पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.गुन्ह्यासाठी वापरलेली कार अयोध्यानगरात सोडून बालाजी व संकेत चौथ्या आरोपीने तयार ठेवलेल्या दुचाकीवरुन औरंगाबादमार्गे पुण्याला पळाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कृष्णाला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखा निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, पंकज उदावंत हे पथक तपास करीत आहेत.समजावून सांगितल्यानंतरही विरोध सुरुचभाग्यश्री व सुमितच्या प्रेमप्रकरणाबद्दल गवगवा होताच कृष्णाने त्या दोघांनाही समजावून सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याला विरोध केला. वारंवार सांगितल्यानंतरही त्यांच्यात बदल न झाल्याने समाजात बदनामी झाली. हाच राग मनात धरुन सुमितचा काटा काढल्याचे समोर येत आहे.अगोदरच रचला कटमागील तीन महिन्यांपासून कृष्णा व बालाजी यांच्यात संपर्क होता. सुमितला धडा शिकवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी १९ डिसेंबर रोजी सुमितचा काटा काढून पलायन केले.२२ जण रडारवरया प्रकरणाशी संबंधित तब्बल २२ जणांची यादीच पोलिसांनी तयार केली आहे. यामध्ये काहींना साक्षीदार बनविले जाणार असून, काहींच्या आरोपींच्या यादीत नाव येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.कृष्णाचे साथीदारांसह पलायनसुमितचा खून झाल्याचे समजताच बालाजी व संकेत हे दुचाकीवरुन पसार झाले, तर कृष्णा हा एका चारचाकी वाहनातून आपल्या साथीदारांसह औरंगाबाद मार्गे पुण्याला रवाना झाले. कृष्णाला पुण्यातून बेड्या ठोकल्या, मात्र कटातील चौथा आरोपी अद्यापही फरारच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून