शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोन्यासारखी लेकरं गेली हो! उसतोड मजुरांच्या ४ मुलांचा नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 14:29 IST

मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते.

गेवराई(जि.बीड) : लेकराला गावात ठेवून चूक झाली... सोबत नेली असती तर वाचली असती... सोन्यासारखी लेकरं गेली हो.... अशा शब्दांत शोकमग्न कुटुंबीयांनी टाहो फोडला.

तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात झालेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुर्दैव अंत झाला. बीड व गेवराईच्या पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शवविच्छेदनास तयार झाले. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. गणेश बाबू इनकर (८), आकाश राम सोनवणे (१०), बबलू गुणाजी वक्ते (११, सर्व रा. शहाजानपूर चकला) व अमोल संजय कोळेकर (रा. तांदळवाडी, ता. बीड) या शाळकरी मुलांचा शहाजानपूर चकला येथील सिंदफणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

अमोल कोळेकर यास तांदळवाडीला सोडण्यासाठी नदीपात्र ओलांडताना चौघेही बुडाले. नदीपात्रात माफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यानेच मुलांचा बळी घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. रात्री नऊ वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. ठोस कारवाई झाल्याशिवाय मृतदेह जागचे हलू देणार नाहीत, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. संताप व रोष व्यक्त करत गावकरी आक्रमक झाल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, गेवराईचे उपअधीक्षक स्वप्निल राठोड, बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके, गेवराई ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप काळे, बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवैध वाळू रोखण्यासाठी ठोस कारवाई करून माफियांना लगाम लावू, या घटनेची पुनरावृत्ती टाळू, असे लेखी आश्वासन दिल्यावर पहाटे दोन वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवले. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाइकांच्या स्वाधीन केले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई-वडील गेले होते ऊसतोडीलादरम्यान, मयत मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते. मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पालकांना निरोप धाडल्यावर ते तातडीने गावी पोहोचले. मुलांचे मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला, त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले.

 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू