शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

सोन्यासारखी लेकरं गेली हो! उसतोड मजुरांच्या ४ मुलांचा नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 14:29 IST

मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते.

गेवराई(जि.बीड) : लेकराला गावात ठेवून चूक झाली... सोबत नेली असती तर वाचली असती... सोन्यासारखी लेकरं गेली हो.... अशा शब्दांत शोकमग्न कुटुंबीयांनी टाहो फोडला.

तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात झालेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुर्दैव अंत झाला. बीड व गेवराईच्या पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शवविच्छेदनास तयार झाले. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. गणेश बाबू इनकर (८), आकाश राम सोनवणे (१०), बबलू गुणाजी वक्ते (११, सर्व रा. शहाजानपूर चकला) व अमोल संजय कोळेकर (रा. तांदळवाडी, ता. बीड) या शाळकरी मुलांचा शहाजानपूर चकला येथील सिंदफणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

अमोल कोळेकर यास तांदळवाडीला सोडण्यासाठी नदीपात्र ओलांडताना चौघेही बुडाले. नदीपात्रात माफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यानेच मुलांचा बळी घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. रात्री नऊ वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. ठोस कारवाई झाल्याशिवाय मृतदेह जागचे हलू देणार नाहीत, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. संताप व रोष व्यक्त करत गावकरी आक्रमक झाल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, गेवराईचे उपअधीक्षक स्वप्निल राठोड, बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके, गेवराई ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप काळे, बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवैध वाळू रोखण्यासाठी ठोस कारवाई करून माफियांना लगाम लावू, या घटनेची पुनरावृत्ती टाळू, असे लेखी आश्वासन दिल्यावर पहाटे दोन वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवले. सोमवारी, दि. ७ रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाइकांच्या स्वाधीन केले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई-वडील गेले होते ऊसतोडीलादरम्यान, मयत मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते. मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पालकांना निरोप धाडल्यावर ते तातडीने गावी पोहोचले. मुलांचे मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला, त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले.

 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू