शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून परतताना वीज कोसळली; पित्याच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 14:06 IST

बीड जिल्ह्यात पावसाचा हा तिसरा बळी आहे.

ठळक मुद्दे डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू पाहण्याची वेळ वडिलांवर आली.

जातेगाव (जि. बीड) : शेतातून घरी परतताना वीज कोसळल्याने पित्याच्या डोळ्यादेखत शेतकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात घडली. बीड जिल्ह्यात पावसाचा हा तिसरा बळी आहे. रवी अर्जुन पवार (२६), असे मृताचे नाव आहे. 

 सोमवारी रवी आणि त्याचे वडील दोघे शेतात कापूस लागवड करत होते. दरम्यान, विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. अचानक कोसळलेल्या विजेचा रवीच्या डाव्या मांडीला स्पर्श होताच तो गंभीररीत्या भाजल्याने मरण पावला. परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने उत्तरीय तपासणी मंगळवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रवी पुढे आणि मागे त्याचे वडील अर्जून हे चालत होते. दोघात अंतरही होते. वीज पडताच रवी जागीच कोसळला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू पाहण्याची वेळ वडिलांवर आली. घटनेनंतर अर्जुन पवार व कुटुंबियांना ग्रामस्थांनी  धीर दिला. 

बीड जिल्ह्यातील काही भागांत हजेरीसोमवारी दुपारी साडेचार वाजेनंतर जिल्ह्यात गेवराईसह तालुक्यातील जातेगाव, गढी, पाडळसिंगी भागात चांगला पाऊस झाला. माजलगावात काही वेळ जोरदार पावसाने शेतकरी सुखावले.  आष्टी शहरासह परिसरात एक तास पाऊस झाला.  परळी शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबाजोगाईसह लोखंडी सावरगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत

जिल्ह्यात सहा तालुक्यात किरकोळ पाऊस झाला.

सोमवारी दुपारी साडेचार वाजेनंतर जिल्ह्यात गेवराईसह तालुक्यातील जातेगाव, गढी, पाडळसिंगी भागात चांगला पाऊस झाला. माजलगावात काही वेळ जोरदार पावसाने शेतकरी सुखावले.  आष्टी शहरासह परिसरात एक तास पाऊस झाला.  परळी शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबाजोगाईसह लोखंडी सावरगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात सहा तालुक्यात किरकोळ पाऊस झाला. 

 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूagricultureशेती