शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

मुस्लीम आरक्षणासाठी वर्षावर पाठवली पत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

बीड : भारतीय म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचा आणि राष्ट्राच्या प्रगतीत भूमिका देण्याचा मुस्लीम समाजाचा हक्क आहे. यासाठी आरक्षण देऊन ...

बीड : भारतीय म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचा आणि राष्ट्राच्या प्रगतीत भूमिका देण्याचा मुस्लीम समाजाचा हक्क आहे. यासाठी आरक्षण देऊन आधार देण्याची गरज असल्याचे शाहेद पटेल यांनी सांगितले. पटेल फाउंडेशनमार्फत सरकारला पत्र पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे ते म्हणाले. आघाडी सरकार पुरोगामी विचाराचे सरकार असून, मुस्लीम युवकांच्या भविष्यासाठी आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मुस्लीम समाजातील युवकांचा शैक्षणिक व सरकारी नोकरीमधील सहभाग अत्यल्प आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रहितामध्ये काम करण्याची संधी समाजातील युवकांना मिळेल व समाजाच्या मुख्यप्रवाहात येण्यास मदत होईल. या महाविकास आघाडी सरकारने या मागणीचा विचार करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीदेखील या पत्र आंदोलनामधून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मांजरसुबा, नेकनूर, लिंबागणेश, माहडूळा, चंकलबा, लिंबारुई, हिंगणी हवेली, पेंडगाव, माळापुरी , बीड शहर, वडवणी, परळी ,माजलगाव यांसह विविध गावांमधून मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची मागणी आहे. दरम्यान, याची ही सुरुवात असून, पुढील काळात मागणी मान्य होईपर्यंत विविध माध्यमातून लढा दिला जाणार आहे.

शाहेद पटेल, सामाजिक कार्यकर्ते.

===Photopath===

170621\17_2_bed_15_17062021_14.jpg

===Caption===

पटेल फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवताना मुस्ली समाजातील युवक दिसत आहेत.