शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

३० वर्षांत सहा मुख्यमंत्र्यांनी दिले अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:40 IST

गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडत पडली आहे. आजतागायत सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. सातत्याने आश्वासनावरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची बोळवण सुरू आहे. राजकीय अनास्थेमुळे ३० वर्षांपासून जिल्हा निर्मितीचा लढा सुरू असूनही, हा तिढा काही सुटत नाही.

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडत पडली आहे. आजतागायत सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. सातत्याने आश्वासनावरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची बोळवण सुरू आहे. राजकीय अनास्थेमुळे ३० वर्षांपासून जिल्हा निर्मितीचा लढा सुरू असूनही, हा तिढा काही सुटत नाही.

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही जुनीच मागणी आहे. गेल्या ३० वर्षात प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमातून आंदोलन, मोर्चे, उपोषण, सुरूच आहेत. गेल्या ३४ दिवसांपासून शहरात धरणे आंदोलन व विविध आंदोलनाचे उपक्रम सुरूच आहेत. अंबाजोगाईशिवाय केज, धारूर, घाटनांदूर, बर्दापूर व विविध गावांमधून जिल्हानिर्मितीची आंदोलने विविध मार्गाने सुरूच आहेत.गेल्या ३० वर्षात अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी सहा मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनावरच बोळवण केली. याला सहावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अपवाद ठरले नाहीत. दोन दिवसांपूर्वी शिष्टमंडळालाही त्यांनी आश्वासन देऊन जिल्हा निर्मितीचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रथम प्राधान्य अंबाजोगाईला देण्याचे आश्वासन दिले.जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक बाबी असतानाही तिढा कायम१९८७-८८ पासून तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकालापासून आश्वासनास प्रारंभ झाला. हा पायंडा पुढे कायम राहिला. यात तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी, कै. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व आता देवेंद्र फडणवीस या सर्वांनी केवळ आश्वासनांचाच कित्ता गिरविला.आजतागायत जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी गेलेल्या सर्वच शिष्टमंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सर्वच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. केवळ राजकीय अनास्थेपोटी जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडत पडला आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी जुनी असतानाही हिंगोली, वाशिम, पालघर येथे जिल्हा निर्मिती झाली. मात्र अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला प्रशासकीय पातळीवर कायम बगल मिळत राहिली. सर्व प्रकारचे अहवाल जिल्हा निर्मितीसाठी असणारी पूरक कार्यालये, सर्व बाबी सकारात्मक असतांनाही तीस वर्षांपासून असणाऱ्या या मागणीचा तिढा का सुटत नाही? हा सवाल अंबाजोगाईकरांना सातत्याने पडत आहे.