शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

३० वर्षांत सहा मुख्यमंत्र्यांनी दिले अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:40 IST

गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडत पडली आहे. आजतागायत सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. सातत्याने आश्वासनावरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची बोळवण सुरू आहे. राजकीय अनास्थेमुळे ३० वर्षांपासून जिल्हा निर्मितीचा लढा सुरू असूनही, हा तिढा काही सुटत नाही.

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडत पडली आहे. आजतागायत सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. सातत्याने आश्वासनावरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची बोळवण सुरू आहे. राजकीय अनास्थेमुळे ३० वर्षांपासून जिल्हा निर्मितीचा लढा सुरू असूनही, हा तिढा काही सुटत नाही.

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही जुनीच मागणी आहे. गेल्या ३० वर्षात प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमातून आंदोलन, मोर्चे, उपोषण, सुरूच आहेत. गेल्या ३४ दिवसांपासून शहरात धरणे आंदोलन व विविध आंदोलनाचे उपक्रम सुरूच आहेत. अंबाजोगाईशिवाय केज, धारूर, घाटनांदूर, बर्दापूर व विविध गावांमधून जिल्हानिर्मितीची आंदोलने विविध मार्गाने सुरूच आहेत.गेल्या ३० वर्षात अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी सहा मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनावरच बोळवण केली. याला सहावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अपवाद ठरले नाहीत. दोन दिवसांपूर्वी शिष्टमंडळालाही त्यांनी आश्वासन देऊन जिल्हा निर्मितीचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रथम प्राधान्य अंबाजोगाईला देण्याचे आश्वासन दिले.जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक बाबी असतानाही तिढा कायम१९८७-८८ पासून तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकालापासून आश्वासनास प्रारंभ झाला. हा पायंडा पुढे कायम राहिला. यात तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी, कै. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व आता देवेंद्र फडणवीस या सर्वांनी केवळ आश्वासनांचाच कित्ता गिरविला.आजतागायत जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी गेलेल्या सर्वच शिष्टमंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सर्वच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. केवळ राजकीय अनास्थेपोटी जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडत पडला आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी जुनी असतानाही हिंगोली, वाशिम, पालघर येथे जिल्हा निर्मिती झाली. मात्र अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला प्रशासकीय पातळीवर कायम बगल मिळत राहिली. सर्व प्रकारचे अहवाल जिल्हा निर्मितीसाठी असणारी पूरक कार्यालये, सर्व बाबी सकारात्मक असतांनाही तीस वर्षांपासून असणाऱ्या या मागणीचा तिढा का सुटत नाही? हा सवाल अंबाजोगाईकरांना सातत्याने पडत आहे.