शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भाज्यांना कवडीमोल भाव, त्यावर कोरोनाचा घाव - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST

माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला ...

माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला देखील परवडत नसतानाच कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शेतातील विहीर व बोअर तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी वेळेत उत्पन्न मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. यामुळे मागील ३-४ महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला काढायचा खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे.

तालुक्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व पाहिजे त्याप्रमाणात ग्राहक नसल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची उपजीविका भाजीपाल्यावरच आहे त्यांचे सध्या बेहाल झालेले दिसून येत आहे. त्यातच पुन्हा कोरोनामुळे तालुक्यातील सर्वच ठिकाणचे आठवडी बाजार बंद केल्याने शेतात आलेला भाजीपाला कोठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित भाजीपाला काढून बांधावर फेकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

-------

मागील ३-४ महिन्यात वांगे २० रुपये, दोडका २५ ते ३०, शेवगा ३०, टोमॅटो ५ , मेथी १०,पालक १०, गाजर २०, शेपू-चुका २०,लसूण ६०, कांदे ३०, पत्ता व फुल कोबी १०, कोथिंबीर २० रुपये किलो भावाने विकला जात आहे.

अगोदरच भाजीपाल्याला भाव नसल्याने आमचा खर्च निघणे मुश्कील झाले होते. व सध्या कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने आम्हाला शेतातील भाजीपाल्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी जागा व वेळ ठरवून दयावा, त्यामुळे आमचे नुकसान होणार नाही.

--- लक्ष्मण राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरी,उमरी