शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

भाज्यांना कवडीमोल भाव, त्यावर कोरोनाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला ...

माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला देखील परवडत नसतानाच कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शेतातील विहीर व बोअर तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी वेळेत उत्पन्न मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. यामुळे मागील ३-४ महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला काढायचा खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे.

तालुक्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व पाहिजे त्याप्रमाणात ग्राहक नसल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची उपजीविका भाजीपाल्यावरच आहे त्यांचे सध्या बेहाल झालेले दिसून येत आहे. त्यातच पुन्हा कोरोनामुळे तालुक्यातील सर्वच ठिकाणचे आठवडी बाजार बंद केल्याने शेतात आलेला भाजीपाला कोठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित भाजीपाला काढून बांधावर फेकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

-------

मागील ३-४ महिन्यात वांगे २० रुपये, दोडका २५ ते ३०, शेवगा ३०, टोमॅटो ५ , मेथी १०,पालक १०, गाजर २०, शेपू-चुका २०,लसूण ६०, कांदे ३०, पत्ता व फुल कोबी १०, कोथिंबीर २० रुपये किलो भावाने विकला जात आहे.

अगोदरच भाजीपाल्याला भाव नसल्याने आमचा खर्च निघणे मुश्कील झाले होते. व सध्या कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने आम्हाला शेतातील भाजीपाल्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी जागा व वेळ ठरवून दयावा, त्यामुळे आमचे नुकसान होणार नाही.

--- लक्ष्मण राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरी,उमरी