शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीत घुसमटले बीड शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:10 IST

बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांच्याकडून सुरळीत वाहतूक करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच आज बीड शहरात नियमांचे उल्लंघन करुन वाहने सुसाट पळविणाऱ्यांसह अवैध प्रवासी वाहतूक करणा-यांचा सुळसुळाट वाढला आहे.

नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान पार पडले. वाहतूक शाखा, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. वास्तविक पाहता आरटीओ कार्यालयाने केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर मात्र ते गायब झाले. वाहतूक शाखेच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. परंतु हे सर्व कार्यक्रम केवळ आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे झाले. त्यामध्ये उत्साह दिसून आला नाही. हे अभियान केवळ करायचे म्हणून करायचे असाच काहीसा निष्कर्ष यातून नागरिकांना पहावयास मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. परंतु या अभियानाचे उद्घाटन आणि समारोपच नागरिकांना समजला. आठ दिवस काय कार्यक्रम झाले, किती प्रबोधन झाले, कोणी लाभ घेतला हे मात्र केवळ कागदावरच राहिले.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के.पी.काळे म्हणाले, शहरातील सिग्नल सुरू करण्यासाठी नगर पालिकेला पत्र दिलेले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पॉर्इंट निश्चत करून त्याठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वाहनधारकांनीही पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.कायमस्वरुपी अधिकारी मिळेनापो. नि. घनश्याम पाळवदे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्याकडे काही दिवस वाहतूक शाखा सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांची गेवराई ठाण्यात बदली झाली. गेवराई ठाण्याचे पोनि सुरेश बुधवंत यांच्याकडे वाहतूक शाखा देण्यात आली. परंतु बुधवंत यांच्याकडे पुन्हा पोलीस कल्याण व इतर कारभार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे वाहतूक शाखेकडे दुर्लक्ष झाले. त्यातच आता आठवडाभरापासून ते सुटीवर आहेत. सध्या पो. उपनि. एस. काळे यांच्याकडे वाहतूक शाखेचा पदभार आहे. वारंवार अधिकारी बदलत असल्यामुळे वाहतूक शाखेचीच ‘कोंडी’ होत आहे. कायमस्वरुपी अधिकारीच मिळत नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे बोलले जात आहे.

अपु-या कर्मचा-यांमुळे समस्यांमध्ये वाढबीड शहर वाहतूक शाखेकडे कर्मचारीही अपुरे आहेत. सध्या ३६ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. पैकी रजा, साप्ताहिक सुटी व इतर कारणांमुळे ८ ते १० जण सुटीवर असतात. त्यामुळे २० ते २५ कर्मचाºयांवरच शहरातील वाहतुकीचा डोलारा आहे. अपुरे कर्मचारी असतानाच व्हीआयपींचा बंदोबस्तही त्यांना करावा लागतो. शिवाय, कारवायांचे ‘टार्गेट’ही पूर्ण करावयाचे असते. हे सर्व करताना वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत.

बैठकांवर बैठका झाल्या, पण उपयोग काहीच नाहीसुभाष रोडवरील वाहतुकीची समस्या लक्षात घेता उप अधीक्षक खिरडकर यांनी या भागातील व्यापाºयांची बैठक घेतली. नाल्यांवर पत्रा टाकून व समोर पांढरे पट्टे ओढून पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. १० मे पर्यंत त्यांना मुदत दिली होती. परंतु याची कोठेच अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नाही. आजही पूर्वीसारखीच जैसे थे परिस्थिती पाहवयास मिळत आहे. उप अधीक्षकांकडच्या बैठकीचा व्यापाºयांवर काहीच परिणाम नसल्याचे दिसून येते. आता पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.बायपासमुळे त्रास कमीबीड शहराला नवीन बायपास झाल्यामुळे अवजड वाहने शहराबाहेरुन जातात. त्यामुळे काही प्रमाणात बीडकरांचा त्रास कमी झाला आहे. परंतु वाहतूक पोलिसांनी जबाबदारीने काम केल्यास वाहनधारकांचा त्रास पूर्णपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु वाहतूक पोलीस प्राधान्याने काम करीत नसल्याचे दिसून येत आहे.

नियमांचे उल्लंघन नकोबीड शहरात वाहतूक पोलिसांकडून कारवाया केल्या जात असल्या तरी वाहनधारकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज आहे. नियमांचे उल्लंघन करू नये.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाTrafficवाहतूक कोंडी