शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

भाज्यांचे भाव वधारल्याने कीचन बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:44 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई आहे. परिणामी तालुक्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचे कीचन बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा परिणाम : पाणीपातळी खालावल्याने भाजी उत्पादनात घट; आवक कमी होत असल्याने भाव वाढले

गेवराई : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणीटंचाई आहे. परिणामी तालुक्यातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने प्रतिकिलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचे कीचन बजेट कोलमडले आहे.सध्या मेथी पालक आणि शेपूची आवक घटली आहे. टंचाईमुळे दिवसेंदिवस भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत प्रतिकिलोचे दर किमान ६० ते ८० रुपयांच्या घरात आहेत यामध्ये वांगी ४० दोङका ६०, भेंडी ६०, गवार ८० रूपये प्रति किलो फूलकोबी २० रूपये नग पानकोबी १५ रूपये नग, कारले ६० रूपये किलो कोथिंबीर १० रूपये चार नग शेपू भाजी २० रूपये पेंढी, हिरवी मिरची ६० रूपये किलो कांदे १५ ते २० रूपये, बटाटे २० रूपये, शेवग्याची शेंग ५० रूपये किलो, हिरवा वाटाणा ४० रूपये किलो असे दर आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे असलेल्या विहिरी आणि विंधन विहिरीची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. परिणामी तालुक्यातील गेवराई, हिरापूर, तलवाडा, सिरसदेवी, पाचेगाव, उमापूर आठवडी बाजारात आठ दिवसांपासून हिरव्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर दिसत आहे.

टॅग्स :Beedबीडvegetableभाज्याMarketबाजार