शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

दोन लाखांसाठी तरुणाचे अपहरण; पाच दिवस शेतात बांधून केली अमानुष मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 12:21 IST

पाच दिवस एका शेतात उपाशी ठेवून केली अमानुष मारहाण

दिंद्रुड: ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी घेतलेले २ लाख रुपये परत दिले नाहीत या कारणाने तरूणाचे अपहरण करत मारहाण केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. जालना जिल्ह्यातील आष्टी येथे एका शेतात जवळपास पाच दिवस अपहृत तरुणाला अमानुष मारहाण करून सोडण्यात आले. दिंद्रुड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील अशोक अंतराम मंत्री याने कांदेवाडी येथील भरत ज्ञानोबा कांदे यांच्याकडून दोन लाख रुपये ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतले होते. ते परत दिले नसल्याचा राग मनात धरून २० जून रोजी दिंद्रुड नजदीक असलेल्या चाटगाव फाट्यावरून अशोकचे अपहरण भरत कांदे, सतीश कांदे, सुरेश ज्ञानोबा कांदे या भावंडांनी केले. अशोकचे वडील अंतराम मंत्री यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात २१ जून रोजी गुन्हा दाखल झाला करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात आष्टी शिवारातील एका केळीच्या बागेत लिंबाच्या झाडाला अपहृत अशोक मंत्री यास पाच दिवस बांधून ठेवले होते. उपाशीपोटी ठेवत अमानुष मारहाण करून २४ जून रोजी मध्यरात्री अशोकला दिंद्रुड नजदीक सोडण्यात आले. अशोकच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. बीड येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड