शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

खुल जा सिमसिम

By admin | Updated: May 16, 2014 00:14 IST

बीड : जिल्ह्याचा खासदार कोण असणार? याचा ‘फैसला’ अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे़ मतांचा पेटारा शुक्रवारी उघडणार असून सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे़

बीड : जिल्ह्याचा खासदार कोण असणार? याचा ‘फैसला’ अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे़ मतांचा पेटारा शुक्रवारी उघडणार असून सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे़ जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडले़ एकूण ३९ उमेदवारांमध्ये ‘फाईट’ झाली़ मात्र, खरी झुंज झाली ती भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांच्यात़ जिल्ह्यातील १७ लाख ७२ हजार १८९ मतदारांना मतदान करण्याचा हक्क होता़ एकूण ६९.२६ टक्के मतदान झाले़ १२ लाख ३७ हजार ७२९ मतदारांनी हक्क बजावला़ दरम्यान, बीडच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेले आहे़ खासदारपदाच्या खुर्चीत कोण बसणार? याचे उत्तर शुक्रवारी मिळणार आहे़ सकाळी आठ वाजेपासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे़ विधानसभानिहाय १६ टेबल असून एकूण ९६ टेबलवर २६ फेर्‍यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया होईल़ उमेदवार, एजंट यांना प्रवेश दिला जाणार आहे़ आक्षेपांचीही दखल घेतली जाणार आहे़ यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केला. वाहतूक व्यवस्थेत बदल अंथरवण पिंप्री ते नाळवंडी नाका हा रस्ता रहदारीस बंद करण्यात आला आहे. अंथरवण पिंप्री मार्गे जाणारी वाहतूक घाटसावळीकडे वळविण्यात आली आहे. तर शहरातून येणारा रस्ता खंडेश्वरी जवळ बंद करण्यात आला असून येथे पार्र्कींगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकार्‍यांची वाहने मतमोजणी स्थळापर्यंत जातील. एक फिरते पथक वळविलेल्या मार्गांनीच वाहतूक रहावी यासाठी एक फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. १५ ठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांचे जत्थे थांबणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या बाहेर ५०० मीटर परिसरात लाकडी बॅरीकेटस् लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती फौजदार प्रवीणकुमार बांगर यांनी दिली. (प्रतिनिधी) मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी अधिकारी, कर्मचार्‍यांना बंदोबस्त वाटप केला़ यावेळी त्यांनी मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय येणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना दिल्या़ सशस्त्र पोलिस मतमोजणीच्या ठिकाणी राहतील़ दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी गडबड गोंधळ करणार्‍यांवर पोलीसांची करडी नजर राहील. कायदा हातात घेणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.