शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

कडा कृ. उ. बा समितीत सुविधांचा दुष्काळ; स्वच्छतागृह, पाणी, रस्ते, निवारा शेड नसल्याने कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST

कडा- ज्या कृ. उ. बा. समितीत जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशात जातो. याच कृ. ...

कडा- ज्या कृ. उ. बा. समितीत जिल्हा, परजिल्हा या ठिकाणावरून आलेला माल महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशात जातो. याच कृ. उ. बा. समितीत संचालक मंडळ व पणन महासंघाच्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी कसलीच सुविधा मिळत नसल्याने मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे.

कृ. उ. बा. समितीत त्वरित सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली.

आष्टी तालुक्यातील कडा येथे कृ. उ. बा. समिती आहे. याच बाजार समितीमध्ये जिल्हा व परजिल्हा या ठिकाणावरून शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी घेऊन येतात. महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या बाजार समितीमध्ये आल्यावर शेतकऱ्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहत नाही.

या ठिकाणी शेतकरी शेती माल घेऊन आला, तर माल उघड्यावर ठेवावा लागतो. शेतकरी थकून आल्यावर आराम करण्यासाठी त्याला निवाराशेड नाही, स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुतारी नाही, त्याचबरोबर अंतर्गत सिमेंट रस्ते नसल्याने मातीचा फुफाटा मोठ्या प्रमाणावर आहे. संरक्षण भिंती, मुख्य गेटचे काम रखडल्याने मोकाट जनावरे त्रास देतात. अशा एक ना अनेक गैरसोयी व सुविधा नसल्याने शेतकरी लोकांची कुचंबणा होत आहे.

संचालक मंडळ व पणन महासंघाने याकडे दुर्लक्ष न करता ज्याच्या जिवावर ही बाजार समिती चालते. किमान त्यांना तरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

जनावरांसाठी असलेला पाण्याचा हौद कोरडेठाक

रविवारी या ठिकाणी आठवडी बाजार असतो. बाजारात गाय, बैल, म्हशी, शेळ्या ही जनावरे विक्रीसाठी लांबलांबून लोक आणतात. खरेदी करण्यासाठी देखील तेवढीच गर्दी असते, पण दिवसभर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा फोडावा लागतो. घरी पाणी पाजून बाजारात आणले की परत घरी गेल्यावरच त्यांना पाणी मिळते. मग एवढ्या थाटामाटात बनवलेल्या हौदात थोडे देखील पाणी ठेवता येत नसल्याने मुक्या जिवाशी देखील खेळले जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुविधांपासून कोसो दूर असलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून संचालक मंडळाने लाखो रुपये खर्च करून कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालय बनवले. मग शेतकऱ्यांना सुविधा देताना दुजाभाव का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कडा कृ.उ.बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.