शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 19:52 IST

बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

केज : तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश नरसू मिसाळ हे राजस्थानमधील सुरतगढ येथे परेडला जाताना भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून सोमवारी सकाळी शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

केज तालुक्यातील उमेश नरसू मिसाळ ( 22) हे 2 वर्षांपूर्वी 25 मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. उमेश मिसाळ यांचे आई, वडील हे ऊसतोड कामगार आहेत. 6 महिन्यापूर्वी केकाणवाडी येथील प्रतीक्षा केकाण यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 15 दिवसांपूर्वीच ते पुतणीच्या लग्नासाठी गावी आले होते. परंतु पुतणीच्या हळदीच्या दिवशीच त्यांना मराठा बटालियनमध्ये तातडीने परत येण्याचे आदेश आले. यामुळे पुतणीचे लग्न सोडून ते  देशसेवेसाठी सुरतगढ, राजस्थानकडे रवाना झाले. 

दरम्यान, सोमवारी सकाळी ते परेडसाठी जात असताना भूमिगत विजवाहिनीतून त्यांना धक्का बसून ते सेवारत असतानाच शहीद झाले. ही वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 2 भाऊ असा परिवार आहे. उमेश मिसाळ यांचे पार्थिव कोल्हेवाडी येथे बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत  पोहचणार असून 9 वाजण्याच्या दरम्यान शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  होणार असल्याची माहिती तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी दिली.

माजी सैनिक संघटनेचे आवाहन...सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळ यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने पुणे येथे घेऊन येणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांच्या मूळ गावी कोल्हेवाडी येथे पार्थिव पोहचेल. शहीद भूमीपुत्रास अंतिम निरोप देण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेच्यावतीने अध्यक्ष अजिमोद्दीन शेख, सचिव प्रा हनुमंत भोसले व सर्व माजी सैनिकांनी केले आहे.

टॅग्स :MartyrशहीदBeedबीडIndian Armyभारतीय जवान