शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पाणी बचतीसाठी जलसाक्षरता रुजविणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

बीड : बदलत्या काळात पाणी बचतीसाठी प्रत्येक नागरिकांमध्ये जलसाक्षरता आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील पाणी आणि पर्यावरण ...

बीड : बदलत्या काळात पाणी बचतीसाठी प्रत्येक नागरिकांमध्ये जलसाक्षरता आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील पाणी आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सतीश खाडे यांनी केले.

येथील महिला कला महाविद्यालयात गृहविज्ञान विभागाच्या वतीने २७ मार्च रोजी ‘महिला आणि जलसाक्षरता’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सविता शेटे यांची उपस्थिती होती.

डॉ. सतीश खाडे म्हणाले, जमिनीतील पाण्याची स्थिती चिंतेचा विषय असून, आपल्याकडील जलचक्र १९७२ पासून बिघडलेले आहे. पावसाची अनिश्चितता, लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा तसेच प्लास्टिकचा अधिक वापर वाढल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

या वेबिनारमध्ये त्यांनी निती आयोग, युएनओ यांचे संशोधनपर निष्कर्ष उपस्थितांसमोर मांडले.

युएनओच्या अहवालानुसार महिलांचा दररोज २० कोटी तास वेळ पाणी शोधणे आणि भरणे यासाठी जातो. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. ६० ते ७० टक्के महिलांना पाण्यामुळे आजार होतात. आईनंतर मुलीच्या वाट्याला पाणी भरण्याचे काम येत असल्याने महिलांमध्ये जलसाक्षरता असणे गरजेचे आहे. ६६ टक्के लोक शेतीवर अवलंबून असून, पाणी साक्षरतेमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉ. खाडे यांनी अ‍ॅक्शन प्लॅन सांगून चर्चा केली.

सूत्रसंचालन डॉ. संध्या आयस्कर यांनी केले. या वेबिनारमध्ये विद्यार्थिनी, महिला, सामाजिक कार्यकर्ते, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, शिक्षक यांनी सहभाग नोंदविला. डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.

चौकट

पाणी बचतीसाठी शास्त्रीय भान गरजेचे

महिलांचा पाण्याशी जास्त संबंध असतो. निसर्गात मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, अप्रत्यक्ष पाण्याचा वापर विचार करायला लावणारा आहे. पाणी बचतीसाठी ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेतून प्रत्येकाला शास्त्रीय भान येणे गरजेचे आहे, असे प्राचार्य डॉ. सविता शेटे यावेळी म्हणाल्या.

अशी होऊ शकते पाणी बचत

वैयक्तिक पाणी वाचविणे, फॅशनेबल कपड्यांचा वापर टाळणे, प्लास्टिक वापर टाळणे, पाण्याचे बजेट करणे, जलसाक्षरता उत्सव, नदी शुद्धीकरण, प्रत्येक घरावर वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी बोअरवेलमध्ये सोडणे अशा बाबी प्रत्येकाने केल्यास निश्चितच पाण्याची बचत करता येईल, असे शेवटी सतीश खाडे म्हणाले.