शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

‘आमचे होत्याचे नव्हते झाले, आता तुम्हीच मदत मिळवून द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे आणि पाझर तलाव फुटल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे आणि पाझर तलाव फुटल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित व जिल्हा परिषदेचे सभापती युधाजित पंडित यांनी भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी ‘आमचे होत्याचे नव्हते झाले, आता तुम्हीच आम्हाला मदत मिळवून द्या’, अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. ज्या तलावाच्या पाण्यावर पुढचे आठ महिने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तो तलाव तासाभरात शंभर टक्के भरून फुटला. त्याच्या वेगवान पाण्याने शेतातील उभे पीकच काय, तर शेत जमिनीही खरडून वाहून गेल्या. अनेकांची घरे पडली, धान्य भिजले, संसार उघड्यावर पडले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बदामराव पंडित व युधाजित पंडित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

शुक्रवारी आणि शनिवारी बदामराव पंडित व युधाजित पंडित यांनी रेवकी-देवकी, धोंडराई सर्कल, खेर्डा, नंदपूर, मारफळा, भेंड खुर्द, उमापूर, मारुतीची वाडी, खळेगाव येथील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी घेतल्या. धीर सोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत लवकरच मिळेल, असा विश्वास बदामराव पंडित यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख कालिदास नवले, सरपंच भय्यासाहेब नाईकवाडे, सरपंच शेख फत्ते, सरपंच धनेश्वर खेत्रे, विलास शिंदे, आबा उबाळे, गणेश शिंदे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.