शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘आमचे होत्याचे नव्हते झाले, आता तुम्हीच मदत मिळवून द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे आणि पाझर तलाव फुटल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे आणि पाझर तलाव फुटल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित व जिल्हा परिषदेचे सभापती युधाजित पंडित यांनी भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी ‘आमचे होत्याचे नव्हते झाले, आता तुम्हीच आम्हाला मदत मिळवून द्या’, अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. ज्या तलावाच्या पाण्यावर पुढचे आठ महिने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तो तलाव तासाभरात शंभर टक्के भरून फुटला. त्याच्या वेगवान पाण्याने शेतातील उभे पीकच काय, तर शेत जमिनीही खरडून वाहून गेल्या. अनेकांची घरे पडली, धान्य भिजले, संसार उघड्यावर पडले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बदामराव पंडित व युधाजित पंडित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

शुक्रवारी आणि शनिवारी बदामराव पंडित व युधाजित पंडित यांनी रेवकी-देवकी, धोंडराई सर्कल, खेर्डा, नंदपूर, मारफळा, भेंड खुर्द, उमापूर, मारुतीची वाडी, खळेगाव येथील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी घेतल्या. धीर सोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत लवकरच मिळेल, असा विश्वास बदामराव पंडित यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख कालिदास नवले, सरपंच भय्यासाहेब नाईकवाडे, सरपंच शेख फत्ते, सरपंच धनेश्वर खेत्रे, विलास शिंदे, आबा उबाळे, गणेश शिंदे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.