शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर 

By शिरीष शिंदे | Updated: September 27, 2022 19:18 IST

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

बीड: जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनेच्या कामात काही अनियमितता झाली आहे का ? याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये समिती स्थापन झाली आहे. मात्र या कामातील प्रत्येक दस्तावेज तपासणी करण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकचा वेळ मागवून घेतला जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जलजीवनचे काम सुरु होताच तक्रारींचा भडिमार झाला. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घेत एक चौकशी समिती स्थापन केली.

ही समिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.चे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक व लेखा अधिकारी यांची चौकशी करणार आहे. सदरील चौकशी अहवाल ३० सप्टेंबर पर्यंत सादर करावा अशा सूचना समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. ई-निविदा व त्या संबंधित इतर कागदपत्रे अधिक असल्याने चौकशीला अधिकचा वेळ लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकचा वेळ मागवून घेतला जाणार आहे. 

टॅग्स :Beedबीड