शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर 

By शिरीष शिंदे | Updated: September 27, 2022 19:18 IST

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

बीड: जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनेच्या कामात काही अनियमितता झाली आहे का ? याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये समिती स्थापन झाली आहे. मात्र या कामातील प्रत्येक दस्तावेज तपासणी करण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकचा वेळ मागवून घेतला जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जलजीवनचे काम सुरु होताच तक्रारींचा भडिमार झाला. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घेत एक चौकशी समिती स्थापन केली.

ही समिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.चे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक व लेखा अधिकारी यांची चौकशी करणार आहे. सदरील चौकशी अहवाल ३० सप्टेंबर पर्यंत सादर करावा अशा सूचना समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. ई-निविदा व त्या संबंधित इतर कागदपत्रे अधिक असल्याने चौकशीला अधिकचा वेळ लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकचा वेळ मागवून घेतला जाणार आहे. 

टॅग्स :Beedबीड