शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जलजीवनच्या कामात अनियमितता? चौकशी अहवालास लागणार उशीर 

By शिरीष शिंदे | Updated: September 27, 2022 19:18 IST

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

बीड: जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनेच्या कामात काही अनियमितता झाली आहे का ? याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये समिती स्थापन झाली आहे. मात्र या कामातील प्रत्येक दस्तावेज तपासणी करण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकचा वेळ मागवून घेतला जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जलजीवनचे काम सुरु होताच तक्रारींचा भडिमार झाला. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घेत एक चौकशी समिती स्थापन केली.

ही समिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.चे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक व लेखा अधिकारी यांची चौकशी करणार आहे. सदरील चौकशी अहवाल ३० सप्टेंबर पर्यंत सादर करावा अशा सूचना समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. ई-निविदा व त्या संबंधित इतर कागदपत्रे अधिक असल्याने चौकशीला अधिकचा वेळ लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकचा वेळ मागवून घेतला जाणार आहे. 

टॅग्स :Beedबीड