शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची चौकशी करा; बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांची दिंडी काढून मागणी

By शिरीष शिंदे | Updated: June 19, 2023 19:38 IST

वारकऱ्यांवर आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान झालेला लाठीहल्ला अशोभनीय

बीड : आळंदी येथील पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान वारकऱ्यांवर लाठीहल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना पालखी मुक्कामी गावात मूलभूत सुविधांची सोय करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अर्थात शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज पायी दिंडी काढली.

शेकडो वर्षांपासून न्याय, समता, बंधुता, संयम, शांतता आणि सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकऱ्यांवर आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान झालेला लाठीहल्ला अशोभनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला. हा हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना काळिमा फासण्यासारखे आहे. या प्रकरणाला जबाबदार कोण आहे ? पोलिस प्रशासन की तिथली व्यवस्था याची उच्चस्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. ज्ञानोबा-तुकाराम माउलींचा जयघोष करत पालखीसह पायी दिंडी शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दिंडीत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, भगवान मोरे, दामोदर थोरात, बाळकृष्ण थोरात, श्रीहरी निर्मळ, रामचंद्र मुळे, ॲड. गणेश वाणी, महादेव कुदळे, शेख युन्नूस, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, अशोक येडे, रमेश गायकवाड, तुकाराम गायकवाड, तुळशीराम पवार, बाबा गायकवाड, संभाजी कोटुळे, संजय पावले, धनंजय सानप, राहुल थिटे, संजय जायभाये, दीपक बांगर, कालिदास वनवे, अशोक सानप, प्रदीप नेवळे,मच्छिंद्र आंधळे यांच्यासह आदी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022