शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार : मच्छिंद्र झाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

गेल्या वर्षी २०२० मध्ये सतत जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पिके ...

गेल्या वर्षी २०२० मध्ये सतत जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पिके असणारे कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर यांसह इतर पिके हे जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला होता. यामध्ये अतिवृष्टीने तालुक्यातील २४,९७० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले होते. यामध्ये ३१,५५१ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीकविमा भरलेला होता. यामध्ये विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७२ तासात ऑनलाइन तक्रार देण्यास सांगितले होते यामध्ये फक्त ६२२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार दिल्याने कंपनीने फक्त याच ६२२ शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करून पैसे दिले आहेत, तरी तालुक्यातील हजारो शेतकरी हे या जाचक अटीमुळे पीक नुकसान होऊनही पीकविम्यापासून वंचित राहणार आहेत. पीकविमा कंपनी ही विमा मिळणार का नाही हेही शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यास तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्याने विमा कंपनी शेतकऱ्यांवर जाणूनबुजून एक प्रकारे अन्यायच करत आहे. तालुक्यातील पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करून पैसे बँक खात्यावर द्यावेत नसता शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी पं. स. सदस्य मच्छिंद्र झाटे यांनी दिला आहे.