शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरूच, ५४३९ बदलीपात्र शिक्षक मात्र २११ शिक्षकांचे अर्ज आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:58 IST

२३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत.यातील २११ शिक्षकांनी अर्ज भरलेच नाहीत तर इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही.

बीड : शासनाने २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबवावी असा निर्णय घेतल्यानंतर यातील पध्दतीला विरोध दर्शवित शिक्षक संघटना रोष व्यक्त करत आहेत. २३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बदल्यांचे गु-हाळ तांत्रिक अडचणींमुळे लांबण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांना  अर्ज भरण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. परंतु यातील संवर्ग १ व २ मधील ९० टक्के एकल शिक्षकांपुढे सुरक्षेचा प्रश्न आहे. ही बदली पद्धती अन्याय करणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आॅनलाईन बदल्यांसाठीचे अर्ज भरताना शिक्षकांची दमछाक झाली. बदल्यांचे पोर्टल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शिक्षकांना अर्ज अनेकवेळा भरावा लागत होता. 

यासाठी बहुतांश शिक्षकांनी रात्र- रात्र जागून काढली. तरीही २११ शिक्षकांनी अर्ज भरले नसल्याची बाब समोर आली. तसेच इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही. त्यामुळे आधी या शिक्षकांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधीची सवलत देण्यासाठी शिक्षण विभागाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले आहे. उद्भवणाºया तांत्रिक अडचणींवर मार्ग काढण्याबाबत शिक्षण विभागाची यंत्रणाही पेचात आहे. 

जिल्ह्यात तीन वर्षांपुर्वी १४३६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. परंतू त्या भाषा, गणित, विज्ञान विषयवार झाल्या नव्हत्या. केवळ घोडेबाजाराला महत्त्व देण्यात आले होते. आता शासन निर्णयाप्रमाणे होणा-या बदली प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. १४३६ शिक्षकांना दर्जावाढ अगोदर करणे आवश्यक आहे. मागे झालेल्या चुकीच्या पदोन्नतीमुळे गोंधळ वाढण्याची शक्यता अधिक आहे.  या नियुक्त्या रद्द करण्याबाबत प्रस्तावही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. या शिक्षकांना जेथे नियुक्त केले जाणार तेथे पटसंख्या नियमाप्रमाणे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरुच राहणार आहे.शिक्षक मोर्चाचे नियोजन

बदल्यांना विरोध नाही, परंतु चुकीच्या पध्दतीला विरोध आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष संपले आहे. अशा वेळी बदल्या केल्या जात आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, २०१४ च्या सर्वसमावेशक निर्णयानुसार बदल्या कराव्यात या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून एकच समन्वय समिती स्थापन केली.

श्रेयासाठी नव्हे, न्यायासाठी बीड येथे ३० आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाºया मोर्चाच्या अनुषंगाने शिक्षक समन्वय समितीच्या बैंकीत ठरल्याप्रमाणे मोर्चाच्या अग्रभागी सर्व शिक्षिका राहणार आहेत. त्यानंतर पदाधिकारी व शिक्षक  राहणार आहेत. प्रशासनाला शिक्षिकाच निवेदन देणार असून भाषणही त्याच करणार आहेत.

अशा होणार बदल्यासहशिक्षक                ४०४८मुख्याध्यापक           ३३५प्राथमिक पदवीधर    १०५६एकूण                       ५४३९