शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरूच, ५४३९ बदलीपात्र शिक्षक मात्र २११ शिक्षकांचे अर्ज आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:58 IST

२३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत.यातील २११ शिक्षकांनी अर्ज भरलेच नाहीत तर इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही.

बीड : शासनाने २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबवावी असा निर्णय घेतल्यानंतर यातील पध्दतीला विरोध दर्शवित शिक्षक संघटना रोष व्यक्त करत आहेत. २३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बदल्यांचे गु-हाळ तांत्रिक अडचणींमुळे लांबण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांना  अर्ज भरण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. परंतु यातील संवर्ग १ व २ मधील ९० टक्के एकल शिक्षकांपुढे सुरक्षेचा प्रश्न आहे. ही बदली पद्धती अन्याय करणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आॅनलाईन बदल्यांसाठीचे अर्ज भरताना शिक्षकांची दमछाक झाली. बदल्यांचे पोर्टल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शिक्षकांना अर्ज अनेकवेळा भरावा लागत होता. 

यासाठी बहुतांश शिक्षकांनी रात्र- रात्र जागून काढली. तरीही २११ शिक्षकांनी अर्ज भरले नसल्याची बाब समोर आली. तसेच इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही. त्यामुळे आधी या शिक्षकांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधीची सवलत देण्यासाठी शिक्षण विभागाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले आहे. उद्भवणाºया तांत्रिक अडचणींवर मार्ग काढण्याबाबत शिक्षण विभागाची यंत्रणाही पेचात आहे. 

जिल्ह्यात तीन वर्षांपुर्वी १४३६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. परंतू त्या भाषा, गणित, विज्ञान विषयवार झाल्या नव्हत्या. केवळ घोडेबाजाराला महत्त्व देण्यात आले होते. आता शासन निर्णयाप्रमाणे होणा-या बदली प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. १४३६ शिक्षकांना दर्जावाढ अगोदर करणे आवश्यक आहे. मागे झालेल्या चुकीच्या पदोन्नतीमुळे गोंधळ वाढण्याची शक्यता अधिक आहे.  या नियुक्त्या रद्द करण्याबाबत प्रस्तावही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. या शिक्षकांना जेथे नियुक्त केले जाणार तेथे पटसंख्या नियमाप्रमाणे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरुच राहणार आहे.शिक्षक मोर्चाचे नियोजन

बदल्यांना विरोध नाही, परंतु चुकीच्या पध्दतीला विरोध आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष संपले आहे. अशा वेळी बदल्या केल्या जात आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, २०१४ च्या सर्वसमावेशक निर्णयानुसार बदल्या कराव्यात या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून एकच समन्वय समिती स्थापन केली.

श्रेयासाठी नव्हे, न्यायासाठी बीड येथे ३० आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाºया मोर्चाच्या अनुषंगाने शिक्षक समन्वय समितीच्या बैंकीत ठरल्याप्रमाणे मोर्चाच्या अग्रभागी सर्व शिक्षिका राहणार आहेत. त्यानंतर पदाधिकारी व शिक्षक  राहणार आहेत. प्रशासनाला शिक्षिकाच निवेदन देणार असून भाषणही त्याच करणार आहेत.

अशा होणार बदल्यासहशिक्षक                ४०४८मुख्याध्यापक           ३३५प्राथमिक पदवीधर    १०५६एकूण                       ५४३९