शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कडबा भडकला, शेतकरी ऊस विकू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:37 IST

जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

बीड : जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. जूनमध्ये १७०० रुपये शेकडा मिळणारा कडबा सध्या २५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कडबा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील ऊस  जळून जाण्याआधीच उपटलेला ऊस शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 

बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाची अवकृपा राहिली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के तोही अनियमित व विषम प्रमाणात झाला आहे. पीक परिस्थिती बिकट असतानाच पशुधन सांभाळणाऱ्या पालकांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. मागील वर्षी पाऊसप्रमाण चांगले राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली. समाधानकारक पातळीमुळे पाण्याची टंचाई भासली नाही. परंतू यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर चाऱ्याची मुबलक उपलब्धता होती. त्यामुळे मे- जूनमध्ये कडब्याचे भाव शेकडा १७०० ते २००० रुपये इतके होते. बीडमध्ये नगर, उस्मानाबाद जिल्ह्यातून कडब्याची आवक बऱ्यापैकी होती. नंतर मात्र पाऊस नसल्याने व दुष्काळी चाहूल लागल्याने कडब्याचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. 

दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने संभाव्य परिस्थिती लक्षात घेत कडब्याच्या दरात तेजीचे वारे सुरू आहेत. सध्या येथील बाजारात कडब्याचे भाव शेकडा २५०० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  कडब्याचे दर १७०० वरून २५०० पर्यंत पोहोचले आहेत, तर वाढ्यासह उसाचे भाव १७०० ते १८०० रुपये आहेत. त्यामुळे कडब्याच्या जागी उसालाही पशुपालक पसंती देत आहेत. पशुधन जगविण्यासाठी पशुपालकांची कसरत सुरु आहे.

बीड येथील मंडईत कोल्हारवाडी, इमामपूर, वायभटवाडी, बीड, काठोडा, पिंपळनेर तसेच तालुक्यातील इतर गावातून शेतकरी कडबा खरेदीसाठी येतात. कडब्याचे भाव लक्षात घेत पशुपालकांनीही आखडते घेतले आहे. लागेल त्यापेक्षा कमी प्रमाणात कडबा खरेदी करतात, असे मधुकर चांदणे म्हणाले. सध्या उत्पादक व मोठ्या व्यापाऱ्यांकडून कडबा पुरवठा कमी होत आहे. पावसावरच भिस्त आहे. पाऊस चांगला झाल्यास कडब्याचे भाव शेकडा १५०० ते २००० रुपये होऊ शकतात, असे सय्यद बाबूभाई यांनी सांगितले. पाऊस परिस्थतीचा अंदाज घेत काही उत्पादक शेतकरी त्यांच्याकडील कडब्याचा स्टॉक तसेच ठेवणे पसंत केले आहे. आणखी तेजीची त्यांना शक्यता आहे. 

एकीकडे कडब्याचे भाव वाढत असताना दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी पावसाअभावी ऊस वाळून जात असल्याने तसेच हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान होण्यापेक्षा येथील कडबा मंडईत वाढ्यासह ऊस विक्रीस आणत आहेत. तालुक्यातील १५ ते २० शेतकरी आर्थिक गरजेनुसार त्यांचा ऊस स्वत: विकत आहेत. 

व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ; कामगारांचा रोजगार घटलाबीड येथील कडबा मंडईत लहान- मोठे २० पेक्षा जास्त व्यापारी आहेत. तर २५-३० कामगार हमाली व इतर कामातून गुजराण करतात. सध्या कडबा मिळत नसल्याने व उपलब्ध कडबा महाग असल्याने तसेच भांडवली गुंतवणूक वाढल्याने या व्यवसायातील काही जण इतर व्यवसायांकडे वळले आहेत. तर आवक घटल्याने कामगारांचा रोजगार घटल्याचे शेख मजहर म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र