शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समितीच्या अहवालाविनाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:02 IST

याबाबत न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे.

ठळक मुद्दे आरोग्य अधिकारी संघटनेचा आरोप वय वाढविणे नियमबाह्य असल्याचा दावा

बीड : आरोग्य विभागातील ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी सरकारने जुलै २०१९ मध्ये वैद्यकीय व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वय ६० वरून ६२ केले. याबाबत न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे. तसेच याबाबत नियुक्त केलेल्या खटुआ समितीचा अहवालही येणे बाकी आहे. अशा स्थितीत हे वय वाढविणे नियमबाह्य असल्याचा दावा करीत वय वाढवू नये, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. वय वाढविण्याला जसे प्राधान्य दिले, तसे पदोन्नती व रिक्त पदे भरण्यास का दिले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६० झाले. त्याची मुदत ३१ मे २०१८ पर्यंत होती. त्यानंतर २८ आॅगस्ट २०१८ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित करून पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली. हे नियमबाह्य होते. याचा फायदा ठराविक लोकांनाच झाला. १५ ते २० वर्षांपासून कार्यरत अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधी यामुळे धुळीस मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे वय न वाढविण्याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल केलेली आहे. याचीही वाट शासनाने पान पाहता शासनाने वयमोर्यादा ६० वरून ६२ केली. यासाठी खटूआ समितीचीही नियुक्ती केली होती. समितीने निर्णय दिला. परंतु निर्णयावर विचार केला नाही. एवढेच नव्हे तर वित्त विभाग, न्याय व विधि विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने याला विरोध दर्शविलेला असतानाही केवळ काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी रिक्त पदांचे कारण पुढे करीत सेवा निवृत्तीचे वय वाढविल्याचा आरोप संघटनेने केला आहे.  याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले असून चर्चेसाठी वेळही मागितला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. आर.बी. पवार, डॉ. भगवान पवार, डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. कपील आहेर, डॉ. विवेक खतगावकर, डॉ. बबिता कमलापूरकर आदींनी याबाबत निवेदन दिले आहे. 

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत शेकडो अधिकारी सेवा निवृत्तीचे वय वाढविताना शासनाने दुजाभाव केला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, विशेष तज्ज्ञांचेच वय वाढविण्यात आलेले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गाकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. वय न वाढविता आहे त्या अधिकाऱ्यांना पदोन्नत्या देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणीही संघटनेने केली आहे. महाराष्ट्रात पदोन्नतीच्या प्रतीक्षेत शेकडो अधिकारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वय न वाढविण्याबाबत आम्ही निवेदन दिले आहे. याचिका न्याय प्रविष्ट असताना आणि खटुआ समितीचा अहवालाचा विचार न करताच ठराविक लोकांच्या फायद्यासाठी सेवा निवृत्तीचे वय वाढविले आहे. हे अन्यायकारक आहे. याबाबत चर्चेसाठी आम्ही आरोग्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे.- डॉ. आर.बी. पवार, अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, महाराष्ट्र.

टॅग्स :BeedबीडMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरState Governmentराज्य सरकार