शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बँड चालकांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

वीजपुरवठा वारंवार खंडित बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ...

वीजपुरवठा वारंवार खंडित

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे ‘महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. वीज चोरांवर कारवाई होत नसल्याने ‘महावितरण’ला भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सीसीटीव्हीची मागणी

गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दिवस-रात्र वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी होत आहे.

गस्त वाढवा

वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

वृक्षतोड थांबवा

पाटोदा : तालुक्यातील अनेक भागांमधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे.

रस्त्याची दुरवस्था

बीड : शहरातील चक्रधरनगर, शिंदेनगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आहे.

उन्हाळी पिकांसाठी सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी

माजलगाव : सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने उन्हाळी पिके घेणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी वीज पंपाचे थकीत वीज बिलांचा भरणा केलेला असला तरी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कृषीपंप सुरू होत नसून पाणी असून पिकांना देता येत नसल्याची स्थिती आहे.

शिवभोजनसोबत बुंदीचे लाडू

धारूर : येथील शिवभोजन केंद्राचा पहिला वर्धापन दिन लाभार्थ्यांच्या भोजनथाळीत मोतीचूर लाडू देऊन साजरा करण्यात आला. गतवर्षी व यावर्षीचे कोरोना काळात हे शिवभोजन योजना सर्वसामान्यांना आधार ठरत असून संचालक राधेश्याम रहेकवल, शिवसेनेचे विनायक ढगे, बंडोबा सावंत, राजकुमार शेटे, नितीनसिंह सद्दीवाल, बाबा सराफ, एएसआय गोंविद बास्टे आदी यावेळी उपस्थित होते.

आठवडी बाजार बंद, व्यापारी संकटात

बीड : तालु्क्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत. बीड, नेकनूर, चौसाळा, पाली, लिंबागणेश तसेच इतर ठिकाणचे आठवडी बाजार बंद आहेत. केवळ भाजी, फळे व जीवनावश्यक वस्तू विक्रीस मुभा आहे; परंतु बाजार बंद असल्याने अन्य छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत.