शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:22 IST

वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : मुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

बीड : वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यात त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे गावागावात टँकरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ मधील जनगणना ग्राह्य धरून केला जात आहे. माणसी २० लिटर पाणी पुरवठा होत आहे. मात्र, २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे.संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या २०११ च्या जनगणनेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. २०११ ते २०१९ या दरम्यान वाढलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून माणसी २० लिटर होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. ८ वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन टँकरच्या खेपा वाढवणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून कुंडलिका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आण िविभागीय आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस