शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आयआरबीच्या गलथान कारभारामुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST

गेवराई : राष्ट्रीय महामार्ग हा आयआरबीकडे असल्याने रस्ता चांगला होईल व अपघात घडणार नाहीत, असे वाटले होते. मात्र या ...

गेवराई : राष्ट्रीय महामार्ग हा आयआरबीकडे असल्याने रस्ता चांगला होईल व अपघात घडणार नाहीत, असे वाटले होते. मात्र या कंपनीकडून टोल वसुलीला प्राधान्य देऊन बाकी सगळा नियोजनशून्य कारभार चालल्याने या महामार्गावर रोजच अपघात घडत असून, ते नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. त्यामुळे संबंधित आरबीआय कंपनीने याकडे लक्ष देऊन सुरळीत नियोजन करून या मार्गावर होणारे अपघात टाळावेत; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५२ वर बीड - गेवराई दरम्यान अपघातांची मालिका रोज सुरू असून, आयआरबी कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दर आठ दिवसाला या महामार्गावर एक-दोन नागरिकांचा बळी जात आहे. तर अनेक ठिकाणी दुभाजक ओलांडताना अडथळे निर्माण होत असून, या ठिकाणी बॅरिकेट असणे आवश्यक आहे. वडगाव ढोक फाटा, गेवराई बायपास, बीड बायपास, पाडळसिंगी या ठिकाणी मोठे दिशादर्शक फलक लावून अपघात टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे. रस्त्यावरील बंद पथदिवे तत्काळ चालू करण्यात यावेत. गतिरोधकाची उंची वाढवून घ्यावी. अपघातस्थळी रुग्णवाहिका वेळेवर पाठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने आठ दिवसांच्या आत सर्व नियोजन व्यवस्थित करावे; अन्यथा पाडळसिंगी टोल नाका येथे मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष मोटे यांनी दिला आहे.