शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

स्वनिधी योजनेची अंमलबजावणी कासवगतीने, फेरीवाले कसे होणार आत्मनिर्भर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

बीड जिल्ह्यात ८ टक्के कर्जवाटप : नगर परिषद, नगर पंचायतसह बँकांची उदासिनता लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात प्रधानमंत्री ...

बीड जिल्ह्यात ८ टक्के कर्जवाटप : नगर परिषद, नगर पंचायतसह बँकांची उदासिनता

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाल्यानंतर दहा महिन्यात केवळ ४६६ लाभार्थ्यांना ४६ लाख ६० हजार रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे या योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथगतीने होत आहे. यामुळे फेरीवाले आत्मनिर्भर कसे बनणार, असा प्रश्न आहे.

कोरोना आपत्तीमुळे विस्कळीत झालेल्या सूक्ष्म पातळीवरील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. केंद्राच्या स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर योजनेतून छोट्या व्यावसायिकांना आधार देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे. या योजनेंतर्गत फूटपाथवरील विक्रेते, फेरीवाल्यांना दहा हजार रूपयांपर्यंत विनातारण, विनाजामीन कर्ज दिले जाते. मात्र, ही योजना अद्यापही फेरीवाल्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेली नाही. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारूरमध्ये नगर परिेषद आहे तर वडवणी, केज, आष्टी, शिरूर आणि पाटोदा येथे नगर पंचायत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचे धोरण आहे. मात्र, नगर परिषद असो वा नगर पंचायत या दोन्ही संस्था या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत कमी पडल्याचे दिसून येत आहे. तसेच फेरीवाल्यांची नोंदणी व त्यांच्या अर्जानंतरची प्रक्रिया गतिमान करण्यात ही यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे बँकांच्या पातळीवर आवश्यक निकष पूर्तता व तपासणीचे कामही संथगतीने होत असल्याने फेरीवाले आत्मनिर्भर होण्यास अवधी लागणार आहे.

पुढील आठवड्यात मिळणार कर्ज

मी धारूर शहरात कटलरी, स्टेशनरी, गृहपयोगी वस्तूंचा गाडा चालवतो. नगर पालिकेमार्फत ऑनलाईन स्वनिधीसाठी अर्ज केला. मात्र, एस. बी. आय. तेलगाव रोड शाखेत तांत्रिक अडचणींमुळे अद्याप कर्ज मिळालेले नाही. पुढील आठवड्यात कर्ज मिळेल, असे बँकेतून सांगण्यात आले. -- अर्जुन मुंडे, धारूर.

---------

६ महिने झाले.

फूटपाथवर व्यवसाय करतो. ऑनलाईन अर्ज करून नगर परिषदेत फाईल केली. त्याला ६ महिने झाले आहेत. अद्यापही कर्ज मिळालेले नाही. आम्ही फोन करू, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. कर्ज मिळाल्यास व्यवसायासाठी आधार होईल. - उदय जव्हेरी, विक्रेता.

-------

शहरात विविध व्यवसाय करणारे शेकडो फेरीवाले आहेत. मात्र, त्यांची परिपूर्ण नोंदणी झालेली नाही. नगर परिषद व नगर पंचायतीने दोन दिवस प्रामाणिकपणे सर्वेक्षण करून नोंदणी केली तर फेरीवाल्यांपर्यंत ही योजना पोहोचेल व त्यांना आधार मिळेल. - भगवान घाडगे, फेरीवाला, बीड.

---------

कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्याचा फोनवर संपर्क न होणे तसेच बँकेतील कामाचा बोजा यामुळे थोडाफार विलंब होत असेल. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. प्रक्रिया सुरू आहे. वेळेत कर्जफेड केल्यास पुन्हा वाढीव कर्जाचा लाभ घेता येतो. - श्रीधर कदम, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

------- या कारणांमुळे बँकांकडून विलंब

शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे काम अद्याप सुरूच आहे. कर्जमाफी व त्यानंतर नवीन कर्ज वाटप प्रक्रिया, वनटाईम सेटलमेंट, पीक कर्जांचे नूतनीकरण, निवडलेल्या लाभार्थीच्या व्यवसाय स्थळाची पाहणी, तपासणी, लाभार्थ्याचा फोन लागत नाही, त्यामुळे संपर्क अथवा शोधणे अवघड जाते.

-------------

प्रधानमंत्री स्वनिधी बीड जिल्हा संक्षिप्त

उद्दिष्ट ५,७७२, अर्ज ४,७९९, मंजूर २,१६६, वाटप ४६६ , प्रलंबित २,६३३ अर्ज मंजूर बीड १,२३८ ३३९ अंबाजोगाई ३८९ १२० आष्टी ३५३ ७५

धारूर १३० १०८ गेवराई ३९० २५६ केज ३४४ १५० माजलगाव ३९१ १४५ परळी ६११ १७८ पाटोदा ९३ ६३ शिरूर कासार ९३ वडवणी ८५१ ७२९