शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेचा अंमल करा; सरपंच, ग्रामसेवकांना कारवाईची पुन्हा तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 17:28 IST

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सीईओंचे यंत्रणेला निर्देश  कुठल्याही परिस्थितीत घरात राहता येणार नाही

बीड  : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण प्रक्रियेबाबत सरपंच, ग्रामसेवकांना त्यांचे कर्तव्य चोख बजावण्याचे पुन्हा एकदा आदेश देण्यात आले असून, हलगर्जी करणाऱ्यांना कारवाईची तंबी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या अनुषंगाने बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशाद्वारे बंधनकारक केले आहे.

दरम्यान, कोविड रुग्णांचे लक्षणे नसलेले, सौम्य, अतिसौम्य आणि तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करुन त्यांना सीसीसी, सीएचसी व डीसीएचमध्ये दाखल करावयाचे आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरात योग्य सुविधा असतील तर संमतीनुसार होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करुन देता येईल. होम आयसोलेशन संदर्भात कार्यप्रणाली, पात्रता व अपात्रतेबाबत निकष, रुग्णांची काळजी घेण्याबाबत सीईओंनी आरोग्य यंत्रणेला दिशा निर्देश जारी केले आहेत. 

कुठल्याही परिस्थितीत घरात राहता येणार नाही- संस्थात्मक विलगीकरणासाठी गाव स्तरावर शाळा, महाविद्यालय,  मंगल कार्यालय अथवा योग्य ठिकाण निश्चित करुन तेथे स्वच्छतागृह,  पाणीपुरवठा, वीज, निवास व्यवस्थेबाबत कळविलेले आहे.- चेक पोस्टवर नोंदणी झालेल्या नागरिकांची पंचायत समिती नियंत्रण कक्षाकडून ग्रामपंचायतला माहिती मिळताच जिल्हा बाहेरून प्रवेश केलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या घरात राहता येणार नाही.- जिल्हा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून दैनंदिन प्रवेशाच्या नोंदी ठेवणे, ग्राम सुरक्षा समिती कार्यरत ठेवणे, गावातील कोविड संशयित रु ग्णांची माहिती तात्काळ आरोग्य विभाग पंचायत समितीला कळविणे महत्त्वाचे आहे.

सरपंच, ग्रामसेवक जबाबदार- बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींच्या संस्थात्मक विलगीकरणाबाबत वेळोवेळी सूचना व आदेश देऊनही बहुतांश ग्रामपंचायत पातळीवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे आॅनलाइन अहवालावरून दिसून आले आहे.- काही गावातील सरपंच व ग्रामसेवक हे गावात राहत नसल्याचेही निदर्शनास आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.- गावस्तरावर निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे अंतिमरित्या कळविले आहे. 

कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अंमल करागावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवणे हे सरपंच आणि ग्रामसेवकांचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यांनी गावात राहणे बंधनकारक आहे. संस्थात्मक विलगीकरण करणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात आवश्यक उपाययोजना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी होऊ न देणे, बाजार भरू न देणे, नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आदी सूचना तात्काळ अंमलात आणाव्यात असे स्पष्ट निर्देश सीईओंनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड