शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अस्वच्छतेमुळे बळावतोय आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:32 IST

उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका अंबाजोगाई : शहरात मुख्य मार्गावर तसेच मोंढा परिसरात बसस्थानक परिसर, मंडीबाजार अशा महत्त्वाच्या ठिकाणी ...

उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका

अंबाजोगाई : शहरात मुख्य मार्गावर तसेच मोंढा परिसरात बसस्थानक परिसर, मंडीबाजार अशा महत्त्वाच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात उभी असतात. शहरातील मंडीबाजार व प्रशांत नगर परिसरात रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांची मोठी संख्या असते. परिणामी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प राहते, तर समोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे लहान मोठे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहे. हा धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप यांनी केली आहे.

विद्युत पंप जोडण्यासाठी लगबग

अंबाजोगाई : मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून कॅनॉलमध्ये उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॅनॉलच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे आता मिळणारे पाणी उसाला देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. कॅनॉलवर विद्युत पंप बसविणे, त्यासाठी महावितरणकडून वीजजोडणी करून घेणे ही कामे प्राधान्यक्रमाने सुरू आहेत. धरणातून पाणी सोडल्यानंतर विद्युत प्रवाहही खंडित होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना साकडे घातले जात आहे.

मोहोर गळाल्यानं आंबा उत्पादनात घट

अंबाजोगाई : वातावरणातील बदलांमुळे व सलग दोनवेळा एकाच महिन्यात गारपीट झाली. त्यामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळाला. गावरान आंब्याला तर मोहोर झडल्याने आंबेच राहिले नाहीत. तालुक्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतात. यावर्षी गारपिटीमुळे मोहोर गळाला. त्यामुळे आंबे मोठ्या प्रमाणात झडून गेले. याचा मोठा फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. बाहेरून येणाऱ्या आंब्यावरच अंबाजोगाईकरांची आंब्याची हौस भागणार आहे.

बँकांसमोर रांगा

अंबाजोगाई : मार्च अखेरमुळे बँकांना असलेली सुटी तसेच होळी, शनिवार, रविवार नंतर धुलिवंदनाची आलेली सुटी. यामुळे बँका बंद राहिल्या. बँका बंद राहिल्यामुळे नागरिक अनेक दिवस व्यवहारासाठी घराच्या बाहेरच पडले नाहीत. त्यातच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यामुळे अगोदरच घाबरलेल्या नागरिकांना मोठ्या सुट्यानंतर बँकांमध्ये आता मोठ्या रांगाचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना व महिलांनाही रांगेत उभारून बँकेचे व्यवहार पूर्ण करावे लागत आहे.

पाण्याअभावी झाडे वाळू लागली

अंबाजोगाई : शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. अंबाजोगाई शहरात वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संगोपन त्यांच्यावतीने केले जाते. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक झाडे वाळू लागली आहेत. अशा स्थितीत पर्यावरणप्रेमींनी आपल्या परिसरातील वृक्ष वाळू नयेत यासाठी लोकसहभागातून या झाडांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वृक्षमित्र मुन्ना सोमाणी यांनी केली आहे.

उकाडा वाढल्याने थंड पेयांना मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून थंड पेयांची मागणी वाढली आहे. जसजसे उन्हाचे तापमान वाढत चालले तसे लिंबू सरबत, उसाचा रस, लस्सी या पेयांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सतत पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे हे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. अशाही स्थितीत नागरिकांना दिलासा देणारे थंड पेय उपलब्ध करून देण्यासाठी अनेक व्यावसायिक पुढाकार घेत आहेत.