शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

फरदड कापूस घेतल्यास पुन्हा बोंडअळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:32 IST

जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्देफरदड कापूसमुक्त गाव अभियान : डिसेंबरमध्येच व्यवस्थापन करून बोंडअळीचा नायनाट करण्याचा कृषी सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये बोंडअळीच्या पतंगाना पोषक वातावण असल्याने वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फरदड कापुस अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात कापसाचे ३ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नुकत्याच झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात बी. टी. वाणाच्या कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. शेंदरी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीदेखील कृषी विभागाने पºहाटीसह उपटून काढण्याचे आवाहन तसेच सुप्त अवस्थेत अळी शेतात राहू नये या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले होते. मात्र फरदड कापूस घेण्याकडेच शेतकऱ्यांचा कल राहिल्याने नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. पहिल्या वेचणीतच कापसाचा झाडा होऊन उतारा केवळ २५ ते ३० टक्केच मिळाला. डिसेंबरमध्ये वातावरण बोंडअळीसाठी अनुकूल असते. कपाशीच्या पºहाटया किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक बनते. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस