शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

राजकारण करायचे नव्हते तर रिपोर्ट तयार नसताना गुन्हा दाखल करण्याची घाई का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:01 IST

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा आरोप : घटनास्थळावर जाण्यास रोखल्याचे वक्तव्य चुकीचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केला आहे. घटनास्थळावर जाण्यास मनाई केल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ८ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बारा कर्मचारी जखमी झाले, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षाच्या संघषार्नंतर कारखान्याची परिस्थिती पुर्ववत चागली झाली असताना नेमके मुंडे साहेबांच्या जयंतीच्या अगोदर झालेली दुर्घटना हादरून टाकणारी व विचारात पाडणारी आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

या घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणं, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणं हे प्रथम कर्तव्य असतं, जे आम्ही व आमच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्याचे घटनास्थळ गाठून, फोटो काढून स्वत:च्या शाबासकीच्या बातम्या स्वत:च देणं आणि कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे त्यांनी केलेले स्टेटमेंट राजकारणाने बरबटलेलं होते असा टोलाही पंकजा यांनी लगावला.

घटनास्थळ सीलतपासात अडचणी येऊ नये, यासाठी घटनास्थळ सील केलेले होते. याठिकाणी कोणालाही जाऊ देऊ नये, असे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले होते. यामध्ये कोणाचेही वैयक्तिक नाव नव्हते. त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे आहे, रोखणाºया पोलीस अधिका-यांना अधिवेशनात बघून घेऊ, अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणा-या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होते.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री