शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मांडवा गावाजवळील जंगलात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:19 IST

: वनविभागासोबतच नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किमी अंतरावर असलेल्या मांडवा ...

: वनविभागासोबतच नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किमी अंतरावर असलेल्या मांडवा गावाजवळील वाण नदीच्या किनाऱ्यावरील डोंगरावरील जंगलास २७ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या वणव्यात १० हेक्टर डोंगर जळून खाक झाला असल्याची माहिती वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.

२७ मार्च रोजी दुपारी मांडवा गावाजवळील वान नदीच्या एका डोंगर उतारावर ही आग लागली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी अंबाजोगाई, परळी क्षेत्रातील वन विभागातील कर्मचाऱ्यांना ताबडतोब एकत्र बोलावून आणि मांडवा ग्रामस्थांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग डोंगर उतारावरील एका दरीत लागली असल्याचे सांगण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी फायर गाड्यांचा उपयोग करण्यात आला.

वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.

१० हेक्टर डोंगर जळाला

या आगीत डोंगर दरीतील १० हेक्टर भागातील गवत व पालापाचोळा जळून खाक झाला. या क्षेत्रात कसल्याही प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली नसल्यामुळे मोठी हानी टळल्याचे वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.

वनअधिकारी, नागरिकांनी दक्षता बाळगावी

दरम्यान अशा बाबतीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी अधिकची दक्षता बाळगावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी केले आहे.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत असा वणवा लागण्याची शक्यता असते. वणवा हा तीव्र उष्णतेने लागू शकतो. बऱ्याचदा वणवा मानवाच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा लागतो. जंगलात सुकलेल्या पानांचा जाळ करताना व काही लोक नवीन चांगले गवत उगवावे म्हणून शिवार आणि सुकलेल्या जमिनीचा काही पट्टा पेटवून देतात. मधाचे पोळे जाळताना आगीचा उपयोग सुद्धा वणव्याला निमंत्रण देते. वृक्षारोपणाबरोबरच अपघात टाळणेही महत्त्वाचे आहे. वनविभागाच्या मालकीच्या जागेत असणाऱ्या वनराईच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी याबाबत विशेष दक्षता व काळजी घेणे आवश्यक आहे असे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी सांगितले.