शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

बीड : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी ...

बीड : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता सर्वांना लागली आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार आहे. मोठ्या शहरातील महाविद्यालयांच्याबाबतीत ही कसरत असलीतरी बीड जिल्ह्यात मात्र दोन-चार महाविद्यालये वगळलीतर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे. बीड जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनांची २६८ महाविद्यालये आहेत. यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. यातच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ४०,५२२

अकरावीची प्रवेशक्षमता - ४४, ६४०

कोणत्या शाखेत किती जागा

कला - २२,५६०

वाणिज्य - १७६०

विज्ञान - १७,७६०

३) महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

मूल्यमापनात गुणवत्तेचा फुगवटा मोठा असल्याने ९० ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेताना अडचणी येणार नाहीत. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात जागा कमी असतील तेथे प्रवेश देताना अडचणी येऊ शकतात. जिल्ह्यात मात्र फारसा फरक पडणार नसल्याची स्थिती आहे.

४) आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

अकरावीत प्रवेशासाठी सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी त्या त्या महाविद्यालयांना स्वतंत्र सीईटी घेण्याशिवाय पर्याय नाही. खरी कसरत अशा महाविद्यालयांना करावी लागेल आणि प्रवेश मेरिटवर दिले आहेत हे सिद्ध करावे लागेल. बाकी महाविद्यालयांत फारशा नियमांचे फिल्टर न लावता प्रवेश देणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनहिताचे ठरेल.

- विवेक मिरगणे, प्राचार्य, बंकटस्वामी महाविद्यालय, बीड

---------

न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाकडून अकरावीच्या प्रवेशासंबंधी मार्गदर्शक सूचनांबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित होणार आहेत. नेहमीप्रमाणे अकरावीचे प्रवेश गुणवत्तेवर द्यावे लागतील. दहावीचा निकालातील गुणवत्तेच्या फुगवट्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, याची शाश्वती नाही. बीड जिल्ह्यात मात्र पसंतीचे कॉलेज मिळू शकेल, त्याचबरोबर तुकड्यादेखील वाढवाव्या लागण्याची शक्यता वाटते.

- वसंत सानप, प्राचार्य, बलभीम महाविद्यालय, बीड

------------

विद्यार्थी चिंतित

अकरावी प्रवेशासाठी मी अर्ज भरला होता. तयारीदेखील सुरू केली होती. पण सीईटी रद्द झाली. मला बीड शहरातील महाविद्यालयात ११वी विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे. कोणतीही अडचण आली नाही. प्रवेशाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

- समृद्धी नरेंद्र कुलकर्णी, बीड

------------

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीसाठी सीईटीची तयारी सुरू केली होती. खरे तर सीईटी व्हायला हवी होती. ती रद्द झाल्याने बीडमधील कॉलेजमध्ये प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार आहे. प्रवेशासाठी कुठलीही अडचण आली नाही.

- सुनील गणेश घोरपडे, बीड

-----------