शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

बीड : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी ...

बीड : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता सर्वांना लागली आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार आहे. मोठ्या शहरातील महाविद्यालयांच्याबाबतीत ही कसरत असलीतरी बीड जिल्ह्यात मात्र दोन-चार महाविद्यालये वगळलीतर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे. बीड जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनांची २६८ महाविद्यालये आहेत. यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. यातच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ४०,५२२

अकरावीची प्रवेशक्षमता - ४४, ६४०

कोणत्या शाखेत किती जागा

कला - २२,५६०

वाणिज्य - १७६०

विज्ञान - १७,७६०

३) महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

मूल्यमापनात गुणवत्तेचा फुगवटा मोठा असल्याने ९० ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेताना अडचणी येणार नाहीत. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात जागा कमी असतील तेथे प्रवेश देताना अडचणी येऊ शकतात. जिल्ह्यात मात्र फारसा फरक पडणार नसल्याची स्थिती आहे.

४) आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

अकरावीत प्रवेशासाठी सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी त्या त्या महाविद्यालयांना स्वतंत्र सीईटी घेण्याशिवाय पर्याय नाही. खरी कसरत अशा महाविद्यालयांना करावी लागेल आणि प्रवेश मेरिटवर दिले आहेत हे सिद्ध करावे लागेल. बाकी महाविद्यालयांत फारशा नियमांचे फिल्टर न लावता प्रवेश देणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनहिताचे ठरेल.

- विवेक मिरगणे, प्राचार्य, बंकटस्वामी महाविद्यालय, बीड

---------

न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाकडून अकरावीच्या प्रवेशासंबंधी मार्गदर्शक सूचनांबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित होणार आहेत. नेहमीप्रमाणे अकरावीचे प्रवेश गुणवत्तेवर द्यावे लागतील. दहावीचा निकालातील गुणवत्तेच्या फुगवट्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, याची शाश्वती नाही. बीड जिल्ह्यात मात्र पसंतीचे कॉलेज मिळू शकेल, त्याचबरोबर तुकड्यादेखील वाढवाव्या लागण्याची शक्यता वाटते.

- वसंत सानप, प्राचार्य, बलभीम महाविद्यालय, बीड

------------

विद्यार्थी चिंतित

अकरावी प्रवेशासाठी मी अर्ज भरला होता. तयारीदेखील सुरू केली होती. पण सीईटी रद्द झाली. मला बीड शहरातील महाविद्यालयात ११वी विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे. कोणतीही अडचण आली नाही. प्रवेशाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

- समृद्धी नरेंद्र कुलकर्णी, बीड

------------

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीसाठी सीईटीची तयारी सुरू केली होती. खरे तर सीईटी व्हायला हवी होती. ती रद्द झाल्याने बीडमधील कॉलेजमध्ये प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार आहे. प्रवेशासाठी कुठलीही अडचण आली नाही.

- सुनील गणेश घोरपडे, बीड

-----------