शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:20 IST

ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले.

ठळक मुद्देगिरीश पटेल : केएसके होमिओपॅथी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र, माजी विद्यार्थी मेळावा

बीड : ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले. होमिओपॅथी विद्यार्थ्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे देशपातळीवर हे विद्यार्थी चमकत आहेत. बीडचा विद्यार्थी देशपातळीवर काम करतो याचे समाधान असून मानवाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा वापर व्हावा असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाच्या वतीने रविवारी पदवी पदव्युत्तर व डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मेळावा व राष्टÑीय सेमिनारचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ.डी.जी.बागल, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.प्रिया महिंद्रे, डॉ.अजित फुंदे, डॉ.बाळासाहेब पवार, डॉ.मंगेश जतकर, डॉ.प्रताप भोसले, डॉ.अन्वर अन्सारी, डॉ.एस. प्रविणकुमार, डॉ.संतोष महानोर, डॉ.अजित कुलकर्णी माजी विद्यार्थ्यांपैकी डॉ.राजेंद्र मुनोत आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. राजेंद्र मुनोतसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.सुधीर निकम यांनी केले. डॉ.गणेश पांगारकर यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत डॉ.महेंद्र गौशाल, प्राचार्य अरूण भस्मे, डॉ.गणेश पांगारकर, डॉ.भागवत मोटे, डॉ.गफर अली, डॉ.अजय कुलकर्णी, डॉ.नितीन राऊत यांनी केले.संस्थेच्या वतीने आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते डॉ.पटेल, डॉ. पवार, डॉ. विजयकर, डॉ.फुंदे, डॉ. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अरूण भस्मे यांनी केले.हे सर्व काकूंमुळेच शक्य झाले - क्षीरसागरआ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्व.काकूंनी डिप्लोमा कोर्सच्या माध्यमातून सुरूवात केलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयात आता पीएच.डी.पर्यंतचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. जवळपास ४ हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण करून आपले व्यवसाय सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथीला मान्यता मिळावी यासाठी आपण सातत्याने शासनदरबारी प्रयत्न केले त्यामुळेच आज हजारो विद्यार्थी या विषयांमध्ये नवनवीन संशोधनाचे मार्ग शोधू लागले आहेत. हे सर्व स्व.काकूंमुळेच शक्य झाल्याचे आ.क्षीरसागर म्हणाले.संघटीत व्हाकुलगुरू डॉ.गिरीष पटेल म्हणाले की, डॉ.अरूण भस्मे एक कुशल आणि शिस्तबध्द प्राचार्य असून माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून संवाद साधता यावा आणि या माध्यमातून प्रत्येकाची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचावी हा मुळ उद्देश त्यांचा आहे. होमिओपॅथीला नवी ओळख निर्माण करण्यासाठी अनेकांचे योगदान आहे त्यात डॉ.भस्मे यांचा वाटा आहे. आत्मविश्वाच्या जोरावर एक विद्यार्थी आपले नाव उंचावू शकतो हे या सेमिनारच्या माध्यमातूनच कळते. होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी आता संघटीत होऊन या पॅथीला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडHealthआरोग्यJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर