शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वंजारी-धनगर एकत्र आले तर इतिहास घडेल; आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 10:13 IST

इंग्रज निजाम या दोन्ही शत्रुंना एकत्र लोळवणाऱ्या धर्माजी मुंडे नाईकांची शौर्यकथा ग्रामस्थ जाणतात पण ती राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर का गेली नाही? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.

बीड - आपलं सरकार आहे. माझे वंजारी बांधव राजकीय प्रगल्भ आहेत. धनगर सध्या राजकीय हिस्सेदारी मागत आहेत. प्रस्थापितांचा जुलमाला गाढायचं असेल तर आपण सोबत येऊ. आपण सोबत आलो की इतिहास घडतो याची साक्ष इतिहास पानापानावर देतो. त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल असा विश्वास भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. 

पडळकर म्हणाले की, नवसाजी नाईकांनी पैनगंगा भागात आपलं राज्य चालवलं. या नदीवरच्या ईसापूर  धरणाला 'आद्यक्रांतीवीर नवसाजीराजे नाईक' नाव द्यावं आणि वंजारी विरांच्या सन्मानासाठी परळी अहिल्यानगर एक्सप्रेसला 'धर्माजीराजे मुंडे एक्सप्रेस' नाव मिळावं. ही मागणी आता मान्य करवून घेऊ. परळी वैद्यनाथाची भूमि ही क्रांतीची, क्रांतीवीरांची भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाने उजळून निघालेली ही भूमी एका क्रांतीविराच्या लढ्याची साक्षी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच इंग्रज निजाम या दोन्ही शत्रुंना एकत्र लोळवणाऱ्या धर्माजी मुंडे नाईकांची शौर्यकथा ग्रामस्थ जाणतात पण ती राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर का गेली नाही? शालेय पाठ्यपुस्तकांचा ,विद्यापीठांचा संशोधनाचा विषय माझा वंजारी वीर का होत नाही? याला कारण आहे प्रस्थापितांच्या मनात असलेली आपली दहशत. एकाच वेळी रामोशी, कोळी, वंजारी, धनगर, भिल्लांनी निजामाविरुद्ध बंड पुकारलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या या जातींचा कधी उल्लेख होतोय का? नाही होत कारण या सर्व जातींनी खास करुन वंजारी-धनगरांनी एकत्र लढा दिला. नवसाजी नाईक आणि धर्माजी नाईक एकत्र लढले हे जर वंजारी धनगरांना कळलं तर वर्तमानात सुद्धा हे लोक एकत्र लढतील. प्रस्थापितांच्या गढ्या, कारखाने, बाजारसमितीच्या सत्ता हिसकावतील याची दहशत यांना आहे असा टोला पडळकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. 

त्याचसोबत प्रस्थापितांनी त्यांचे कोळशे सुर्यासारखे रंगवले आणि आमचे हिरे खाणीत फेकले. आता हे होणार नाही. आम्ही आमच्या वीरांना डोक्यावर घेऊन नाचू. वंजारी धनगर एकीचा नारा बुलंद करु. निजाम आणि इंग्रजांच्या बुंदकी आणि तोफगोळ्यांना तलवारीच्या पात्यावर चिरणारी लोक आहोत आपण. कुठल्या तरी टेकूजीरावानं यावं आणि दरडवून ह्यांव कर आणि त्यावं कर सांगावं याचे दिवस गेलेत असंही पडळकरांनी सांगितले. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर