शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:22 IST

कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला.

ठळक मुद्देयोगेंद्र यादव : कर्जमाफीच्या नावाखाली अन्य मुद्दे दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केलेली सर्व आश्वासाने फोल ठरली आहेत. त्यांनी सामान्य नागरिकांसह, व्यापारी, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला. तसेच स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभरात हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा मुद्दा घेऊन जनगृती केली जाईल, असे ते म्हणाले.बीड येथे गुरुवारी सकाळी योगेंद्र यादव यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा.सुभाष वारे, वचिष्ठ बडे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती. पुढे बोलताना यादव म्हणाले, स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभर आयकॅन मोहीम राबवली जात आहे. यात सर्व नागरिकांना, स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. योग्य मुद्यांवर व्यापक जनमत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या नावाखाली इतर मुद्दे दुर्लक्षित केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कर्जमाफीपेक्षाही शेतमालाला योग्य भाव महत्त्वाचा असून, त्यात मात्र कोणालाच रस नसल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती द्या परंतु शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही? याचीही काळजी घ्या असा सल्लाही यादव यांनी दिला.हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकमेंकाविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे. दोघांमध्ये भांडण लावण्याचे काम सत्तेतील लोक करत आहेत. नक्षलवादाला देशद्रोह म्हणून संबोधणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये भांडणे लावणे, द्वेष पसरविणे हाच खरा देशद्रोह असल्याचा आरोप यादव यांनी यावेळी केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीYogendra Yadavयोगेंद्र यादव