शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:22 IST

कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला.

ठळक मुद्देयोगेंद्र यादव : कर्जमाफीच्या नावाखाली अन्य मुद्दे दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केलेली सर्व आश्वासाने फोल ठरली आहेत. त्यांनी सामान्य नागरिकांसह, व्यापारी, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला. तसेच स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभरात हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा मुद्दा घेऊन जनगृती केली जाईल, असे ते म्हणाले.बीड येथे गुरुवारी सकाळी योगेंद्र यादव यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा.सुभाष वारे, वचिष्ठ बडे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती. पुढे बोलताना यादव म्हणाले, स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभर आयकॅन मोहीम राबवली जात आहे. यात सर्व नागरिकांना, स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. योग्य मुद्यांवर व्यापक जनमत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या नावाखाली इतर मुद्दे दुर्लक्षित केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कर्जमाफीपेक्षाही शेतमालाला योग्य भाव महत्त्वाचा असून, त्यात मात्र कोणालाच रस नसल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती द्या परंतु शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही? याचीही काळजी घ्या असा सल्लाही यादव यांनी दिला.हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकमेंकाविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे. दोघांमध्ये भांडण लावण्याचे काम सत्तेतील लोक करत आहेत. नक्षलवादाला देशद्रोह म्हणून संबोधणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये भांडणे लावणे, द्वेष पसरविणे हाच खरा देशद्रोह असल्याचा आरोप यादव यांनी यावेळी केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीYogendra Yadavयोगेंद्र यादव