शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

२०२३ मध्ये हिंदू राष्ट्र; बीडमध्ये हिंदू धर्मजागृती सभेत वक्त्यांनी केला दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:30 IST

भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समिती प्रत्येकाला ‘योद्धा’ बनविणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम युवासेनेचे संस्थापक भाजपचे आ. टी.राजासिंह यांनी केले. सभेत सर्वच वक्त्यांनी २०२३ मध्ये अखंड हिंदू राष्ट्र स्थापन होणारच, असा दावा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समिती प्रत्येकाला ‘योद्धा’ बनविणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम युवासेनेचे संस्थापक भाजपचे आ. टी.राजासिंह यांनी केले. सभेत सर्वच वक्त्यांनी २०२३ मध्ये अखंड हिंदू राष्ट्र स्थापन होणारच, असा दावा केला.

येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी जाहीर हिंदू धर्मजागृती सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याचे समन्वयक मनोज खाडये, सनातन संस्थेच्या संत स्वाती खाडये, सुराज्य अभियानचे समन्वयक आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे महाराष्टÑ संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आदी उपस्थित होते.

धर्मजागृती सभेच्या अनुषंगाने आ. टी. राजासिंह हे आकर्षण होते. ‘भारत देश को अखंड हिंदू राष्टÑ बनाना सबका लक्ष्य हैं’ म्हणताच श्रोत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. ते म्हणाले, धर्म, परंपरांविषयी खोटा आणि विकृत इतिहास पसरविला जात आहे. भारताला अखंड ठेवायचे असेल तर प्रत्येकाने सैनिक व्हावे. ते म्हणाले, ‘हम दो, हमारे दो’ असा कायदा सगळ्यांना करावा, यासाठी पंतप्रधान आणि खासदारांना पत्र लिहिण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी नीलेश सांगोलकर म्हणाले, मंदिराचे सरकारीकरण घोटाळ्यांविरोधात हिंदू विधिज्ञ परिषद सातत्याने लढा देत आहे. पुरोगामी, राज्यकर्ते व पोलीस मुस्कटदाबी करणार असतील तर स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.यावेळी संत स्वाती खाडये यांनी धर्म जगला तर राष्ट्र आणि राष्ट्र जगले तर समाज जगेल, त्यामुळे जात, पात, संप्रदाय, पक्षात गुरफटलेल्या हिंदूंनी संघटीत होण्याचे आवाहन केले.यावेळी मनोज खाडये म्हणाले, कायदा सर्वांसाठी सारखाच असावा. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयानुसार गरिबांच्या सामूहिक विवाहासाठी मंदिरातील धन वापरले जाणार आहे. हिंमत असेल तर सरकारने चर्च आणि मशिदीतील पैसाही यासाठी वापरुन दाखवावा, असे आव्हान दिले. भगवा दहशतवाद कधीच नव्हता आणि हिंदू दहशतवादी कधीच नव्हता. कायद्याने सोयीसुविधांसाठी हिंदू राष्ट्र स्थापना आवश्यक असल्याचे ते म्हणाले.पावसानंतरही चोख नियोजन : हिंदू राष्ट्रचा जयघोषरविवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे सभास्थळी अंथरलेल्या चटया गोळा झाल्या होत्या. महिला, पुरुष स्वयंसेवकांनी काही वेळेतच सभास्थळ सुसज्ज केले. सभास्थळी येणा-या प्रत्येकाचे औक्षण करुन गुलाब पाण्याचा वर्षाव केला जात होता. डास प्रतिबंधासाठी सभा परिसरात लिंबाच्या पाल्याचा धूर केला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवकही त्यांना मदत करीत होते. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदूत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा राजश्री तिवारी यांनी मांडला. मिलिंद धर्माधिकारी आणि सुमित सागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजन बुणगे यांनी आभार मानले.यावेळी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सभास्थळी क्रांतिकारकांची यशोगाथा आणि धर्माचरणाचे महत्त्व विशद करण्यासाठी बालकांनी वेशभूषा साकारली होती, ‘जय तू, जय तू हिंदू राष्ट्र’ याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मा जिजाऊ, झाशी की राणी, महाराणा प्रताप आदींचा जयघोष झाला.‘जिहाद’ भयंकर षडयंत्र‘लव्ह जिहाद’ हे भयंकर आॅर्गनायझेशन असल्याचे सांगत आ. राजासिंह म्हणाले, अनेक हिंदू मुली बेपत्ता आहेत, सिमीवर बंदी आणल्यानंतर लव्ह जिहादच्या माध्यमातून षडयंत्र रचले जात आहे. हिंदू जनजागृती समिती याबाबत प्रबोधन करीत असल्याने त्यांचे रक्षण होईल असे ते म्हणाले. एकीकडे देश विभाजनाची भाषा करणाºयांच्या विरोधात पोलीस काहीच बोलत नाहीत तर दुसरीकडे राष्ट्र कार्य करणा-यांवर पोलीस बंधने आणण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांनी केला. जातीच्या नावावर फूट पाडण्याचे काम सध्या सुरु असून, सर्व काही विसरुन देश आणि धर्म रक्षणासाठी एकत्रित येण्याचे आवाहन राजासिंह यांनी केले. यावेळी गोरक्षणाचे आवाहन त्यांनी केले. हिंदूंनी हिंदू हितालाच प्राधान्य दिले पाहिजे, असे आ. राजासिंह ठाकूर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडHinduहिंदूMarathwadaमराठवाडा