शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

विमा कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी बीड यांनी ५० ...

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी बीड यांनी ५० टक्के नुकसान झालेल्याचा अंदाज व्यक्त करत २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश विमा कंपनीने नाकारले आहेत. याविरुद्ध मांजारसुंबा ते पाटोदा महामार्गावर लिंबागणेश येथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती, तसेच कंपनीच्या जाचक अटी रद्द करून तत्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत माहिती दिली तरच लाभ मिळणार असल्याचे कंपनीकडून जाहीर केले आहे. मात्र, लाभ न देण्यासाठी असे प्रकार विमा कंपनीकडून केले जात असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने स्थळ पंचनामे करावेत व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी, तसेच महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली व जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, उपसरपंच शंकर वाणी, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, गणेश मोरे, बाळासाहेब मुळे, कृष्णा पितळे, आकाश पितळे, बाळासाहेब वायभट, दत्ता घरत, पांडुरंग वाणी, अभिजित गायकवाड, विनायक वाणी, संतोष भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

020921\02_2_bed_22_02092021_14.jpg

लिंबागणेश येथे महामार्ग रोखण्यात आला